रत्नागिरी शहरात जलवाहिनी खोदाई नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरात पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या कामासाठी केलेल्या रस्ते खोदाईने रस्त्यांची अतिशय बेकार अवस्था करण्यात आलेली आहे. ढिसाळ नियोजनामुळे विकासाच्या नावाखाली रत्नागिरी नगर परिषदेचा भोंगळ कारभाराने येथील सारी जनतेत पचंड संतापाची खदखद होत आहे. रस्त्यात चर खोदाई होतेय पण ती निटनेटकेपणाने बुजवली जात नसल्याने नागरिकांना, वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाबाबत नगर परिषद प्रशासन झोपा काढते का, अशा संतप्त प्रतिक्रिया शहरवासीय व्यक्त करीत आहेत.
पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी रत्नागिरी शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. आज शहराच्या गल्ली-बोळातील रस्त्यांची तसेच बाजारपेठ, मुख्य रस्त्यांचीही खोदाई झालेली आहे, अजूनही हे काम थांबलेले नाही. या खोदाई केलेल्या चरांमुळे रस्त्याने वाहने हाकावित कशी, असा सवाल नागरिकांना पडला आहे.