शेतकऱयांना फटका : दरवषी हेच चित्र : आवश्यक बी-बियाणे उपलब्ध करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कृषी खात्यामार्फत खरीप आणि रब्बी हंगामांसाठी शेतकऱयांना सवलतीच्या दरात बी-बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध केली जातात. मात्र, रयत संपर्क केंद्रांतून अनावश्यक बी-बियाणांचा भरणा अधिक असल्याने शेतकऱयांची गैरसोय होत आहे. परिणामी शेतकऱयांना ती खासगी दुकानांतून चढय़ा दराने खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांची बी-बियाणे वेळेत मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. रयत स्ंापर्क केंद्रांतून आवश्यक बी-बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, यासाठी अनेक वेळा मागणी करूनदेखील याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने शेतकऱयांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शेतकऱयांना आवश्यक बी-बियाणे वेळेत मिळावीत, याकरिता तालुक्मयातील बेळगावसह उचगाव, काकती, हिरेबागेवाडी आदी ठिकाणी कृषी रयत संपर्क केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी आवश्यक बी-बियाणांऐवजी अनावश्यक बी-बियाणांचा भरणा अधिक असतो. परिणामी शेतकऱयांना खासगी दुकानांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रयत संपर्क केंदे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
शेतकऱयांना सवलतीच्या दरात आवश्यक बी-बियाणे व खते हंगामाच्या वेळेत उपलब्ध व्हावीत, याकरिता तालुक्मयात रयत संपर्क केंद्रे सुरू आहेत. मात्र, ही केंदे कुचकामी ठरताना दिसत आहेत. या केंद्रांतून नवीन सुधारित जातीची बी-बियाणे, सेंद्रिय खते, रासायनिक खते, शिवाय इतर आधुनिक अवजारे उपलब्ध नसतात. या ठिकाणी मोजकी बी-बियाणे वगळता अनावश्यक बियाणांचा भरणा अधिक असतो. शिवाय अलीकडच्या हवामानात न येणारी बी-बियाणे केंद्रात ठेवली जातात. त्यामुळे शेतकऱयांना रयत संपर्क केंद्रात जाऊन बी-बियाणे न घेता माघारी परतावे लागत आहे.
शेतकरी योजनांपासून वंचित
रयत संपर्क केंद्रांतून अनावश्यक बी-बियाणे व अवजारांचा भरणा जास्त असल्यामुळे कृषी खात्याच्या लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. दरवर्षी शासन व कृषी खात्यातर्फे शेतीसंबंधीच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकऱयांपर्यंत एकही योजना येऊन पोहचत नाही. खरीप व रब्बी हंगामात शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, त्या शेतकऱयापर्यंत पोहचण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी अनेक योजनांपासून वंचित राहत आहेत.