उद्योग खात्री योजनेतून वनविभागात अनेक तलाव-छोटेखानी धरणे उभारण्याचे काम
प्रतिनिधी / बेळगाव
उन्हाळा सुरू झाला की अनेक वनविभागात पाणी समस्या निर्माण होते. तशीच अवस्था काहीशी बेळगाव तालुक्मयात निर्माण झाली होती. मात्र, वन्यप्राण्यांना त्रास होऊन नये, यासाठी आता अनेक ठिकाणी तलाव व छोटेखानी धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. या कामाला उद्योग खात्रीची जोड देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. होनगा व इतर परिसरात असलेल्या वन विभागात असे तलाव व धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा लाभ होणार आहे.
सरकारी योजना अनेक असतात. मात्र, त्या योजनांचा उपयोग योग्य ठिकाणी होणे गरजेचे आहे. बऱयाच वेळा योजना कागदावरच राहतात, तर योजना राबवूनदेखील त्या कुचकामी ठरतात. मात्र, वनविभागाने उद्योग खात्री योजना वन्य प्राण्यांसाठी राबविली आहे. उद्योग खात्री योजनेतून धरण निर्मिती केली आहे.
उद्योग खात्रीतून वनविभागाच्या अखत्यारित येणाऱया काकती-होनगा येथे हे धरण बांधण्यात आले असून वंटमुरी व इतर परिसरात तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्मयातील डोंगराळ भागातील पाणी जमिनीत मुरवावे व पाणी पातळी वाढावी यासाठी तत्कालीन तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांचे प्रयत्न मोठे आहेत. यासाठी त्यांनी तालुक्मयातील अनेक ठिकाणी 45 ते 50 तलावांची निर्मिती केली. याला उद्योग खात्रीची जोड देऊन अनेक समस्या मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते.
वनविभाग आणि तालुका पंचायत तसेच ग्राम पंचायतीनेही पुढाकार घेऊन तालुक्मयात असणाऱया अरण्य परिसरात प्राण्यांसाठी कोणतेच धरण अथवा पाण्याचे स्रोत नव्हते. त्यामुळे काही प्राणीही दगावले. मात्र, या ठिकाणी सरकारकडून निधी मागितला तर बराच उशीर लागणार आणि पुन्हा पाण्यामुळे प्राण्यांचे हाल होणार, अशी चिंता व्यक्त करत अनेक ठिकाणी छोटेखानी धरणे निर्माण करून ही समस्या मार्गी लावण्यात आली आहे.
उद्योग खात्रीतून या धरणांच्या उभारणीला प्रारंभ केला. दररोज 400 कामगारांना या ठिकाणी काम देण्यात आले होते आणि बघता बघता धरण उभे राहिले. आता यामध्ये पाण्याचा साठा होऊ लागला आहे. या परिसरातील प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या या धरणाचा फायदा झाला आहे. बेळगाव तालुक्मयात प्राण्यांसाठी धरण बांधण्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण झाला. काकती येथील अरण्य हे शेकडो एकरमध्ये पसरले आहे. या ठिकाणी अनेक जातीचे प्राणी आहेत. मात्र पाणी नसल्याने काही प्राणी मानवी वस्तीत घुसत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या धरणाला उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आणि धरण बांधून पूर्ण झाले. त्यामुळे आता समस्या मिटली असून अनेकांतून समाधानही व्यक्त करण्यात आले आहे.
कोरोना काळातही उद्योग खात्रीतून 8 हजार कामगारांना काम
कोरोना काळात काही काळ उद्योग खात्रीचे काम बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन ही कामे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अनेकांवर उपासमारीची वेळ येत असल्याने सरकारने ही कामे आपापल्या जबाबदारीवर आणि कोरोनाचे नियम पाळत करावीत, असे आवाहन केले होते. त्यामुळे तालुक्मयातील 8 हजार कामगारांना दररोज काम मिळत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुका हा उद्योग खात्रीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हाही राज्यात प्रथम आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योग खात्री योजनेतून अनेकांना पसंती देण्यात आली आहे. राज्यात उद्योग खात्रीतून काम देण्यास बेळगाव तालुका अव्वल आहे. त्यामुळे उद्योग खात्रीची कामे मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहेत. बेळगाव तालुक्मयातील सुमारे 8 हजार कामगारांना कामे देण्यात आली आहेत. उद्योग खात्रीतून अजूनही कामे देण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे.
बेळगाव तालुक्मयातील अनेक भागांमध्ये ही कामे सुरू करण्यात आली आहेत. उद्योग खात्रीतून वन खात्यामध्ये वृक्षारोपणासाठी खड्डे खोदाई करण्यात आली आहे. छोटेखानी धरणे व इतर कामांना चालना देण्यात आली आहे. बेळगाव येथील उद्योग खात्रीतून सध्या अनेक तलाव व नाल्यांची खोदाई करण्यावर भर देण्यात आला आहे. परिणामी याचा फायदा शेतकऱयांना होत आहे. कोरोना काळात दररोज 8 हजार कामगारांना काम देण्यात येत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही अधिक कामगारांना काम देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तातडीने पाऊल उचलण्यात येणार आहे.