वाहतूक शाखेला सकाळच्या मंडईतल्या गाडय़ाच दिसतात का?
प्रतिनिधी/ सातारा
शहरात दिवसेंदिवस पार्पिगचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. कोणत्या ही पेठेत जावा वाहन कुठे लावायचे हा प्रश्न सातारकरांच्यासमोर उभा असतो. सातारा बसस्थानकासमोरच्या मंडईत दररोज सकाळी भाजी खरेदी करणाऱया सातारकरांना परत येईपर्यंत आपली गाडी जाग्यावर दिसत नाही. भाजीची पिशवी घेवून वाहतूक शाखा गाठावी लागते. तर शहरात ठिकठिकाणी वाहने कित्येक दिवस रस्त्याच्या कडेला उभी केलेली आहेत. त्यावर वाहतूक शाखा, अतिक्रमण विभाग व आरटीओ यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे.
सातारा शहर वाहतूक शाखेबाबत आणि अतिक्रमण हटाव पथकाबाबत सध्या प्रचंड नाराजीचा सुर सर्वसामान्यांमध्ये आहे. सातारा बसस्थानक येथे सकाळी शेतकऱयांची मंडई भरते. त्या मंडईत सातारकरांना वाहने लावण्याची जागाच नाही. त्याचबरोबर पुढे सेव्हन स्टार इमारतीत सुद्धा पार्किंगची जागा नाही. तेथे त्यांनी खासगी पार्किंग केले आहे. त्यामुळे खरेदीकरता जाणाऱयांना रस्त्यात गाडी लावली की लगेच वाहतूक शाखेची प्रेंन गाडी उचलून नेते. सकाळी भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या साताकरांना दररोज सकाळी तोच अनुभव येतो. भाजी 100 रुपयांची आणि शहर वाहतूक शाखेचा दंड 600 रुपयांचा द्यावा लागत आहे. त्याबाबत प्रचंड संताप सातारकरांच्या मनात आहे.
शहरातील मनाली हॉटेल ते प्रकाश लॉज ते पोलीस मुख्यालय या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने लागलेली दिसतात. त्यामुळे वाहतूकीची अडचण बनते. पोवई नाका ते पोलीस मुख्यालय या मार्गावरही शिक्षक बँकेपासून पुढे दोन्ही बाजूने वाहने उभे केलेली दिसतात. त्यात कित्येक वाहने ही कित्येक दिवस तशीच उभी असतात. पुढे पोलीस करमणूक केंद्र ते सातारा तालिम संघ या दरम्यान रस्त्यावर कित्येक दिवसापासून तशीच वाहने लावलेली आहेत. याकडे मात्र पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग, वाहतूक शाखा तसेच आरटीओ कार्यालय दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून उभी असलेली ही वाहने वाहतूकीला अडथळा आणत असतात.
पालिकेने व वाहतूक शाखेने पार्किंगची सोय करावी
मी माझी गाडी फुटपाथच्या वर लावली होती. भाजी खरेदी करुन परत आलो तर वाहतूक शाखेचे कर्मचारी माझी गाडी उचलून क्रेनमध्ये ठेवत होते. त्यांना विनंती केली असता त्यांनी ऐकले नाही. मला भाजीची पिशवी घेवून रिक्षाने वाहतूक शाखेत जावे लागले. तेथे मला दंड भरावा लागला. पालिकेने आणि वाहतूक शाखेने पार्किंगची सोय करावी.