नवी दिल्ली
राजकारणाचे खेळ आता पुरे झाले. विद्यार्थ्यांनी निरर्थक आंदोलनांमध्ये आपला वेळ घालविण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असा मोलाचा सल्ला योगगुरू बाबा रामदेव यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि भारतातील इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांन दिला आहे. विद्यार्थ्यांनी अफवा आणि हिंसाचार पसरविणे हे अत्यंत अयोग्य असून असे प्रकार थांबविले जावेत, अशी सूचना त्यांनी केली. अशा हिंसक आंदोलनामुळे भारतानचे नाव जगात डागाळले जात आहे. राजकीय पक्ष विद्यार्थ्यांना भडकवित आहेत. त्यांना आपल्या हातचे बाहुले बनविण्याचा राजकीय पक्षांचा डाव आहे. तो विद्यार्थ्यांनी वेळीच ओळखावा व स्वतःला या जाळय़ात अडकवून घेऊ नये.