ऑनलाईन टीम / जयपूर
राजस्थानमध्ये मागील चोवीस तासात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 83 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 6 हजार 98 वर पोहचली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
83 नव्या रुग्णांमध्ये डुंगरपुर मधील 28, उदयपूरमध्ये 10, जयपूर आणि नांगौरमध्ये प्रत्येकी 8, राजसमंदमध्ये 6, बिकानेरमध्ये 6, अलवर मधील 4 आणि भीलवाडा, अजमेर, कोटा व बाडमेरमध्ये प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. सरकारच्या दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 150 वर पोहोचली आहे. गुरुवारी मृत्यू झालेले 3 रुग्ण हे जयपुर, भरतपुर आणि सीकर मधील होते.
मृत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या जयपुर मध्ये आहे. कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 74 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जोधपूरमध्ये 17 आणि कोटा मधील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात 22 मार्चपासून लॉक डाऊन जारी असून, अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला आहे.