प्रतिनिधी/ मुंबई
राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने ई-पासची अट रद्द केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांर्तगत रेल्वे प्रवासाला परवानगी दिली आहे. यासाठी आजपासून म्हणजे 2 सप्टेंबरपासून बुकींग सुरू केले जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मध्ये रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार आरक्षण पध्दतीने प्रवाशांना आजपासून 2 सप्टेंबरपासून राज्यांर्तगत रेल्वे प्रवासासाठी बुकींग करता येणार आहे. कोरोनामुळे राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता, तर आता लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यानुसार राज्यांर्तगत एसटी प्रवास आणि ई-पासची अट रद्द केल्यानंतर आता मध्य रेल्वेने राज्यांर्तगत प्रवासासाठी दिलेल्या परवानगीमुळे नागरिकांना एका जिल्ह्य़ातून दुसऱया जिल्हय़ात सहज प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शत तत्वात मेट्रो रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्रात आणखी महिनाभर मेट्रो रेल्वे बंदच राहणार आहे.