परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले संकेत
प्रतिनिधी/मुंबई
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी संकेत दिले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात काल 67 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री परब बोलत होते. ते म्हणाले की, वाढत्या रुग्णव्यवस्थेमुळे आरोग्यव्यवस्था तोकडी पडत आहे. सध्या राज्यातील बसेस राज्याच्या बाहेर जात नाहीत. तसेच बाहेरच्या बसेस राज्यात येत नाहीत. तरीही परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला जातोय. या वाहतुकीकडे परिवहन खाते पूर्ण लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील.
एसटी कर्मचाऱयांचे लसीकरण
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यात एसटी कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आतापर्यंत अनेक बसचालक आणि बसवाहकांचा कोरोनामुळे मफत्यू झालेला आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱयांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती परब यांनी दिली. एसटी कर्मचाऱयांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई काम करणाऱयांचे प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. जे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेतय त्याची दाखल घेण्यात आली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱयांना मदतीचा हात कसा देता येईल तसेच त्यांना संसर्ग कसा होणार नाही याबाबत नक्की उपायोजना करण्यात येईल, असे परब म्हणाले.
कुंभमेळÎातील साधूंचे विलगीकरण होणार
उत्तर प्रदेशमधील कुंभमेळÎात लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या साधूंपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कुंभमेळÎाहून परतणाऱयांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. कुंभमेळÎामध्ये मोठा संसर्ग झाला असून तेथून परतणारे लोक सुपर प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून कुंभमेळÎाहून परतणाऱया लोकांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तशा सूचना नाशिकच्या जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत, असेही मंत्री परब यांनी सांगितले.