अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 6 जुलै 2021, स. 11.15
● सोमवारी अहवालात 960 बाधित ● पॉझिटिव्हिटी दर 11.32 टक्के ● एकूण नमुने तपासले 8,482 ● rt-pcr पॉझिटिव्हिटी दर 14.54 ● आकडेवारीचे घोळ अद्याप सुरूच ● एकूणच आकडेवारीचे ऑडिट करा ● गावनिहाय माहिती देण्याची मागणी
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्रात बाधितांची संख्या कमी होत आहे. दिल्लीसारखे कोट्यवधी लोकसंख्येचे शहर देखील आटोक्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रातील फक्त सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आकडे तसेच आहेत. हे नक्की काय चालू आहे, अशा शंका उपस्थित होत आहेत. जिल्ह्यात रविवारी 666 एवढ्या कमी संख्येने अहवाल बाधित आल्याने वाढ मंदावल्याचा दिलासा मिळत असतानाच सोमवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा बाधित वाढीचा रतीब सुरू झाला असून, 960 नवीन बाधित रुग्ण समोर आलेले आहेत. यामध्ये सध्या बेड मिळण्यासाठी ताणाताण आता नसली तरी पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये संसर्ग आटोक्यात आलेला आहे. मात्र सातारा जिल्ह्यात त्याची तीव्रता अजून तीच आहे.
आकडेवारीचे घोळ अद्याप सुरूच
2 जून तारखेला फलटण तालुक्यातील मृत्यू 286 होते आणि पाच जूनच्या प्रशासनाच्या अहवालात 457 हे कसे? 3 दिवसांत काय झालं ? असा सवाल जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पोस्ट वरील बातमीवर वाचकांनी विचारलेला आहे. फलटणमध्ये पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून येणारे आकडेवारी आणि त्यादिवशीची तालुका आकडेवारी यामध्ये तफावत आढळून येत आहे याची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. तसाच प्रकार कोरेगावची कालची मृत संख्या 389 दाखवताय आणि आजची 376 दाखवत आहात अशी चुकीची माहिती देऊ नका, असा सल्ला या फेसबुक पेजवर देण्यात आलेला आहे.
एकूणच आकडेवारीचे ऑडिट करा
नेमके बाधित झाले किती नेमके मुक्त झाले किती आणि एकूण मृत झाले किती ही माहिती देताना दैनंदिन आकड्यात ज्या पद्धतीने तफावत दिसून येते. रविवारचे उपचारार्थ रूग्ण आणि सोमवारचे उपचारार्थ रूग्ण यातील गोलमाल काही कळेना 11075 —1026 = 10049 असे यायला हवे. मात्र, सरकारी वजाबाकी 8813 आहे. तर 10 दिवसापूर्वी नक्कीच बाधित संख्या 120 च्या आसपास नसणार आहे. मग फक्त एकशे वीस जणांना कसे काय घरी सोडण्यात आले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत माहिती कार्यालयाच्या फेसबुक वरच एका नागरिकाने कुछ तो गडबड है… कॉमेंट केलेली आहे.
गावनिहाय माहिती देण्याची मागणी
सर्व तालुक्यांमधून पेशंटच्या नाव आणि गाव असणारी लिस्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळते हे सर्व लोकांना माहीत आहे. त्यामुळे गावनिहाय माहिती द्या. अशी ही नागरिकांची मागणी असून ज्या तालुक्यात रूग्णसंख्या जास्त आहे, पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे, तिथे कडक निर्बंध लागू करा. ज्या तालुक्यात वरील बाबी कमी आहेत तिथल्या नागरिकांना पूर्ण लाॅकडाऊनचा त्रास नसावा. जिथे रूग्ण जास्त तिथे बंधने जास्त असे धोरण असायला पाहिजे. तर लसीकरण प्रामाणिकपणे करा किंवा बंद करा. लस इतर औषधाप्रमाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावी. आमची आम्ही घेवु हेलपाटे मारुन आणि रांगा लावून वैताग आलाय आता, या नागरिकांच्या प्रतिक्रियांचे प्रशासनाने मनापासून दखल घ्यायला हवी निश्चितच.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.32
सोमवारी रात्री च्या अहवालात आठ चार आठ दोन जणांचे तपासणी करण्यात आलेली असून त्यापैकी 960 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे त्यामुळे जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्हिटी दर 11.32 असा राहिलेला आहे यामध्ये अंतिजन रॅपिंग टेस्ट 6,047 एवढे झालेले असून त्यापैकी 606 जणांचा अहवाल बाधीत आहे त्याचा पॉझिटिव्हिटी दर 10.02 एवढा असून 2,4 35 जणांची rt-pcr टेस्ट करण्यात आल्यानंतर 354 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे त्यामुळे rt-pcr चा पॉझिटिव्हिटी दर 14.54 एवढा वाढलेला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 11,15,114, एकूण बाधित 1,97,451, एकूण कोरोनामुक्त 1,84,369, मृत्यू 4,768, उपचारार्थ रुग्ण 8,813
सोमवारी जिल्हय़ात बाधित 666, मुक्त 1,692, बळी 14