बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेषत: बेंगळूरमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बुधवारीसरकारने रात्री वेळ पर्यंत होणाऱ्या पार्टींवर बंदी घातली आहे.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ. सुधाकर यांनी यासंदर्भात त्वरित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना पुढील प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आम्ही रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे कारण अशा कार्यक्रमांच्या वेळी अधिक लोक एकाच ठिकाणी जमतात. तसेच कोविड -१९ प्रकरणात शेजारील राज्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणूनच बेंगळूर आणि राज्यातील इतर भागात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सर्व पावले उचलत आहोत, असे सुधाकर म्हणाले.
या व्यतिरिक्त, मंत्री म्हणाले की विवाहसोहळा आणि इतर तत्सम कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच डॉ सुधाकर यांनीआंतरराज्यीय प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत, असे स्पष्ट केले आहे.