मनात आले म्हणून मंदिर बांधणे योग्य नाही
गल्लोगल्ली मंदिरे बांधण्याचे पेव फुटले आहे. लोकात धार्मिकता वाढावीं, त्यांच्यात सात्विकता जागावी हा हेतू असेल तर ते चांगलेच आहे, पण अनेक मंदिरे पाहिली असता तेथे देवाधर्माचा अथवा भक्तीचा लवलेशही दिसत नाही. मंदिरे कुणी बांधावीत व कुणी बांधू नयेत, याचे काही धार्मिक संकेत असतात. मनात आले म्हणून मंदिरे बांधल्यास त्याचा काहीही फायदा होत नाही व अशी मंदिरे उर्जितावस्थेत येत नाहीत. अनेक ठिकाणी आपण मंदिरे पाहतो, त्यातील बहुतांश मंदिरे भग्नावस्थेत असतात. घाण, पालापाचोळा, उंदीर, घुशींचे साम्राज्य, मूर्तीवर प्रचंड प्रमाणात धूळ साचलेली असते. आयुष्यात त्या मंदिराची स्वच्छता डागडुजी अथवा पूजाअर्चा कुणी केली आहे की नाही, असा प्रश्न काही मंदिराच्या बाबतीत पडतो. एखाद्या मंदिरामुळे लाभ होतो, असे समजताच त्याच प्रकारची मंदिरे बांधण्याची स्पर्धा सुरू होते. देव म्हणजे चेष्टा नव्हे, मंदिरे बांधताना त्यात स्थापित होणाऱया देवतेची पूर्ण माहिती, आकार, पथ्यपाणी, त्याचा आशीर्वाद अथवा क्रोध, प्रायश्चित, त्याची मंत्रसिद्धी, या सर्वांची माहिती असल्याशिवाय मंदिर बांधण्याच्या भरीस पडू नये. अनेक मंदिराच्या आसपास नको ती आकर्षणे अथवा व्यापारी आस्थापने असतात. त्यामुळे ते मंदिर आहे की बाजार, ते कळत नसते. काही जण मंदिर बांधताना यावर कळस बांधतात, पण कळस म्हणजे काय, त्याचे महत्त्व, तो कशासाठी बसवितात, कळस जर बसविला तर त्याचे महत्त्व, अबाधित राहील का? महत्त्व माहीत नसताना कळस बसविला तर त्यातून कोणते धार्मिक अथवा शापीत अरिष्ट ओढवू शकते, याची माहिती अनेकांना नसते व माहिती करून घेण्याची इच्छाही नसते. पूर्वीच्या पुण्यवान ऋषिमुनीनी व शंकराचार्यानी अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. आज हजारो वर्षे होत आली, पण त्यांनी बांधलेल्या मंदिराची उर्जितावस्था व त्यांची अध्यात्मिक जागृती आजही बऱयाच ठिकाणी दिसून येते. तिरुपती बालाजी मंदिर, कोल्हापुरची अंबाबाई, वणीचे सप्तश्रृंगी, श्रृंगरीचे शारदापीठ, तुळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, उत्तर भारतातील बद्रीकेदार, यासह अनेक जागृतस्थळे आजही आपले महत्त्व टिकवून आहेत. कारण ती स्थळे मंदिरांचे सर्व नियम पाळून बनविलेले आहेत.
मेष
पत्रव्यवहार, विवाह, धनलाभ, खरेदी-विक्री व भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. अनेक गूढ समस्यांवर मात कराल. नवा व्यवसाय सुरू कराल. मूळ पत्रिकेत शुभ योग असल्यास एखादी नवी व्यक्ती आयुष्यात येईल व संपूर्ण जीवन पालटून जाईल.
वृषभ
कर्जफेड कराल. नवीन व्यवसायाची सुरुवात होईल. वाहन वगैरे जपून हाताळा. शत्रूच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. मानसिक तणाव कमी होईल. वैवाहिक जीवन व जोडीदाराच्या नोकरी व्यवसायाला चांगले वळण. एखाद्याला केलेली मदत यावेळी उपयोगी पडेल.
मिथुन
मित्रमंडळीच्या दृष्टीने घेतलेले निर्णय काही जणांना आवडणार नाहीत. त्यामुळे गैरसमजाला वाव मिळेल. मित्राच्या थट्टा-मस्करीमुळे नको त्या व्यक्तींकडून बोलून घ्यावे लागेल. इतरांना आधार देताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहार जपून करावेत.
कर्क
काही पेचप्रसंग कमी होतील. आजार असतील तर ते कमी होऊ लागतील. अनेक समस्या मिटतील. धनलाभाच्या दृष्टीने अतिशय चांगले ग्रहमान आहे. नवीन व्यवसाय अथवा शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत सावध लागेल. नोकरी, व्यवसाय या बाबतीत लाभदायक घटना.
सिंह
घरगुती बाबतीत महत्त्वाचे फेरबदल, वास्तुतील दोषनिवारण केल्यास प्रगतीतील अडथळेही दूर होतील. नातेवाईकांच्या बाबतीत काही अप्रिय घटनांची शक्मयता. पण तरीही महत्त्वाच्या सर्व कामांमध्ये मनासारखे यश मिळवाल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती. नव्या कला क्षेत्रात प्रवेश कराल.
कन्या
नोकरीसाठी चालू असलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने जीवनात समाधान. घराण्यात पूर्वांपार चालू असलेले गैरसमज नष्ट होतील. धनलाभाचे योग. पण वायफळ खर्च फार वाढेल. वास्तुखरेदी, लग्नाच्या वाटाघाटी यात यश. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. काही शारीरिक दोष उफाळून येतील.
तूळ
चुकीच्या सल्ल्यामुळे धोका, फसवणूक, आर्थिक हानी होण्याची शक्मयता. स्वतः विचार करून जे निर्णय घ्याल तेच योग्य असतील. पण पूर्वी कोठे गुंतवणूक केलेली असेल तर मात्र मोठा फायदा होईल. घरातील अडगळ काढून टाकल्यास भाग्योदयाच्या बाबतीत अनुकूल फरक दिसेल. घरात देवांच्या मूर्ती भंगल्या असतील तर त्या काढा. समस्या मिटतील.
वृश्चिक
एकाला एखादी वस्तू आवडली म्हणजे ती दुसऱयालाही आवडेलच असे नसते, याचा अनुभव येईल. नवीन व्यवसाय, घरदार, प्रवास, विवाहाच्या वाटाघाटी यासाठी ग्रहमान अनुकूल राहील. आर्थिक अडचणी असतील तर त्यातून सुटका होईल. नवीन नाते संबंध जोडण्यासाठी हालचाली सुरू होतील.
धनु
साडेसातीमुळे काहीवेळा मानवी मनाला नैराश्येचे मालिन्य येते, पण त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर होऊ देऊ नका. घरमालक व भाडेकरू यांच्यातील वाद मिटतील. नोकरी व्यवसायात नवीन माणसाला घेऊन त्याच्या सूचनेने वागा. फरक पडलेला दिसेल. अनेक महत्त्वाच्या कार्याचा शुभारंभ होईल.
मकर
शिक्षण, विवाह, संतती, धनलाभ व अडलेल्या कामांना गती मिळेल. मुलाबाळांचा भाग्योदय होईल. अनामिक भीती व गूढ समस्यांवर मात कराल. उच्च शिक्षण खंडित झाले असेल्यास सुरू करा. घरात स्फोटक वस्तूंचा साठा असेल तर त्यापासून दूर रहा. साडेसाती सुरू असल्याने काही कामे खोळंबतील.
कुंभ
घरगुती समस्या कमी होण्यासाठी कुणी काही मंत्रून वगैरे दिलेले असेल तर ते पाण्यात विसर्जित करा, अन्यथा त्रास वाढेल. मुलाबाळांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. नवीन व जुन्या कामाचा ताण वाढण्याची शक्मयता आहे. पूर्वजांनी लिहून ठेवलेले काही महत्त्वाचे दस्तऐवज सापडतील.
मीन
अनेक वेळा भगीरथ प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते अचानक होते. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्मयता कमी असताना ते आपणहून परत मिळतील. व्रात्य मुले अचानक चांगले वागू लागतील, तसा काही अनुभव आल्यास दैवीकृपा झाल्याचे ते लक्षण समजावे.