जिल्हाधिकाऱयांना हिंदू जनजागृतीचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रध्वजाचा अवमान बऱयाचवेळा होत आहे. प्लास्टिकचे ध्वज स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताक दिनी वापरले जातात. त्यानंतर ते ध्वज फेकून दिले जातात. हा एकप्रकारे ध्वजाचा अवमान आहे. तेंव्हा अशाप्रकारे अवमान करणाऱयांवर तसेच प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
स्वातंत्र्यदिन आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता ध्वज विक्री करण्यात येत आहे. प्लास्टिकचे ध्वज विक्री करू नये, यासाठी कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आताच पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनादिवशी बऱयाच ठिकाणी ध्वजाचा अवमान होत असल्याच्या घटना घडत आहेत. तशा अधिकारी तसेच कर्मचाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी सुधीर हेरेकर, उज्ज्वल गावडे, सदानंद मासेकर, मिलन पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.