नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कॉंग्रेस नेते राहुल गांधी वारंवार देशातील लसीकरण, कोरोना स्थिती, वाढती महागाई, बेरोजगारी, अशा विविध मुद्दयावरून मोदी सरकारव टीका करत असतात. आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करत चांगलाच निशाणा साधला आहे. कोरोना लसीचा अभाव, एलएसी, बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्यांच्या समस्या याबद्दल त्यांनी ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “सदियों का बनाया पलों में मिटाया, देश जानता है कौन ये कठिन दौर लाया।” कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकरावर टीका केली आहे. त्यांनी कोरोना लसीचा अभाव, एलएसी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्यांच्या समस्या याचा उल्लेख टॅगमध्ये केला आहे. त्यांचे टॅग पाहता त्यांना मोदी सरकरावर निशाणा साधायचा आहे हे स्पष्ट होते.
या आठवड्यात राहुल यांनी खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीबद्दलही ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘खाया भी, ‘मित्रों’ को खिलाया भी. बस जनता को खाने नहीं दे रहे.’ यावेळी त्यांनी आपल्या ट्विटसह Price Hike हॅशटॅगचा वापर देखील केला होता.
राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून कठोर भूमिका घेतांना दिसतात. त्यांचे प्रत्येक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.