प्रतिनिधी / सातारा :
राष्ट्रीय विरोधी दिनानिमित्ताने सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांनी खिशाला काळय़ा फिती लावून काम करुन शासनाचा निषेध नेंदवला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांना देण्यात आले.
निवेदन देताना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र संकपाळ, महेश गुरव व इतर उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य सरकारी गट ड चुतर्थश्रेणी कर्मचारी महासंघाची 10 जुलै 2021 रोजी औरंगाबाद येथे बैठक झाली. त्या बैटकीत 15 जुलै राष्ट्रीय स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या खाजगीकरण व चुकीचे कर्मचारी धोरण व राष्ट्रीय पेन्शन योजना यासारख्या योजनांच्या विरोधात राष्ट्रीय संघटना राष्ट्रीय विरोधी दिन साजरा करणार आहेत. त्यात सहभाग म्हणून काळय़ा फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आहोत, असे म्हटले आहे.