लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे घाघरा नदीमध्ये दोन बोटी बुडाल्या असून 25 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लखीमपूर खेरी जिह्यातील धौरहरा तालुक्मयातील मिर्जापूर गावाजवळ घाघरा नदीमध्ये एक बोट बुडाली. या बोटीमध्ये 10 प्रवासी होते. तर दुसरी घटना जंगल मटेराजवळ घडली. घाघरा नदीच्या वेगवान प्रवाहामुळे 15 प्रवाशांसह बोट पलटी झाली. दोन्ही दुर्घटनेमध्ये मिळून 25 जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. सध्या पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान असल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्मयता वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच गावकऱयांनी नदीकाठी गर्दी केली, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले होते.