ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लडाखमधील पेंगाँग त्सो तलावाजवळ पुन्हा एकदा चीन आणि भारताचे जवान आमनेसामने आले. यावेळी चिनी सैन्याने भारतीय जवानांवर दगडफेक करत काटेरी अच्छादन असलेल्या दंडुक्याचा वापर केला. भारतानेही अशाच प्रकारे चिनी सैन्याला प्रत्युत्तर दिले.
मागील दोन आठवड्यांपासून लडाखमध्ये चीन आणि भारतीय जवानांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ सैनिकांची संख्या वाढवली आहे. आज पुन्हा एकदा दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले. यावेळी चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांना जखमी करण्यासाठी काटेरी अच्छादन असलेल्या दंडुक्याचा वापर करण्यात आला. भारतीय जवानांनीही अशाच प्रकारे चिनी सैन्याला प्रत्युत्तर दिले. सध्या चीनचे 5000 सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहेत.