दोडामार्ग / वार्ताहर :
उत्तर प्रदेश येथील लखिमपुर खेरी येथे शेतकऱ्यांवर मागुन अमानुषपणे गाडी चढवूली व यात निष्पाप असे चार ते पाच जण चिरडून ठार झाले. उत्तर प्रदेश योगी सरकार आणि केंद्र सरकारने यावर अद्याप काहीही कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ दोडामार्ग येथील राष्ट्रीय काँग्रेस कमीटीने तहसीलदार अरुण खानोलकर यांना लेखी निवेदन दिले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक यांच्यासह जिल्हा चिटणीस सुभाष दळवी, तालुका उपाध्यक्ष शिवदास मणेरकर, सरचिटणीस सुधीर चांदेलकर, राजन गोवेकर, आणि अंकुश गवस व कार्यकर्ते उपस्थित होते. लखीमपुरा येथे हि अमानुष दुर्घटना घडल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना तेथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेच्या नावाखाली त्यांना तेथे जाण्यापासून रोखले व अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री व छत्तीसगडचे मुख्यमंत्री यानाही रोखण्यात आले. त्यामुळे या सर्व घटनेचा राष्ट्रीय काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला.