गतवर्षाच्या तुलनेत यंदा निधी मंजुरीत 5 लाखाची कपात
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या निधी कपातीचा फटका राज्यातील जंगलांनाही बसला आहे. वन वणवा नियंत्रणासाठी राज्याच्या वनखात्याकडून बेळगाव वनविभागाला 25 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. गतवषी 30 लाखाचा निधी मंजूर झाला होता. त्या तुलनेत यंदा 5 लाखाची कपात करण्यात आली आहे.
दरवषी जंगलांना आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. मागीलवषी आग लागून नुकसान होण्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा उन्हाळय़ाच्या तोंडावरच वनविभागाला निधी जाहीर झाला आहे. खात्याकडून जंगलांना आग लागू नये आणि लागली तर ती पसरू नये म्हणून दरवषी जाळरेषांचे काम हाती घेतले जाते. यंदाच्या हंगामात बेळगाव विभागात 6143 हेक्टरमध्ये तब्बल 37 लाख रोपांची लागवड केली आहे. जिल्हय़ात सर्वाधिक वनक्षेत्र हे खानापूर तालुका विभागातील जांबोटी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी भागात आहे. याठिकाणी वणवा नियंत्रणासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
वनखाते वृक्ष लागवड अधिक करून वनक्षेत्र वाढविण्यासह वनक्षेत्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहराबाहेर व शहरी क्षेत्रातील आगीच्या वाढत्या घटनांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी वनविभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. वणवा नियंत्रणासाठी केंद्र तसेच राज्याकडूनही निधी दिला जातो. त्यातून जाळरेषा तयार करणे व इतर कामे हाती घेतली जातात. मजुरांचे वेतनही यातून दिले जाते. तसेच गस्ती पथक आणि इतर बाबींचा यात समावेश असतो. मात्र यावषी निधी कपातीचा फटका या सर्वांना बसणार आहे.