भीमगड, लोंढा, कणकुंबी, नागरगाळी वनक्षेत्राचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
वनक्षेत्रातील वाघांची निर्दिष्ट संख्या समजण्यासाठी वनखात्यामार्फत बुधवारपासून व्याघ्रगणनेला प्रारंभ होणार आहे. वनखाते, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव विभागातील वनक्षेत्रात व्याघ्रगणना राबविली जाणार आहे. अलीकडे वनक्षेत्राबरोबर वाघांचे भक्ष्य म्हणून ओळखल्या जाणाऱया इतर वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याने साहजिकच वाघांच्या संख्येत वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज वनखात्याने बांधला आहे.
दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. त्यामुळे देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांची एकूण संख्या समजते. मात्र, मागील वर्षभरात कोरोनामुळे व्याघ्रगणना लांबणीवर पडली होती. आता वनखात्याने पूर्ण तयारी केली असून व्याघ्रगणनेला सुरुवात होणार आहे. याकरिता वनक्षेत्रात लावलेले सेन्सर, ट्रक कॅमेरे, पावलांचे ठसे व वि÷sच्या आधारे वाघांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
बेळगाव विभागातील खानापूर तालुक्मयात वाघांची संख्या अधिक आहे. येथील घनदाट वनराई, बांबूचे आच्छादन, हिरवेगार गवत आणि बारमाही वाहणारे झरे यामुळे वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः चितळ, सांबर, हरिण, काळवीट यांच्या संख्येत वाढ झाल्याने त्यांच्यावर उपजीविका करणाऱया वाघांची संख्या वाढली आहे. भीमगड अभयारण्य, लोंढा, खानापूर, कणकुंबी, नागरगाळी, जांबोटी आदी ठिकाणांच्या वनक्षेत्रात गणना केली जाणार आहे. शिवाय वनक्षेत्रात वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही
कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावरून व्याघ्रगणना करणे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे व्याघ्रगणनेनंतर एकूण वाघांची संख्या समोर येणार आहे.