वृत्तसंस्था/ नवी दिलली
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे लोकांच्या राहणीमानात मोठय़ा प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले आहे. सध्या याच बदलाच्या स्विकारण्याकडे नागरिकांचा कल वेगाने वळत आहे. विविध कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यासह कार्यालयाच्या बाहेर राहून काम सुरू ठेवण्याकडे कंपन्यांचा भर राहिला आहे. यामध्ये आयटी कंपन्यांचा सर्वात मोठा सहभाग वर्क फ्रॉम होमकडे असल्याचे उपलब्ध अहवालामधून समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या फेब्रुवारी ते मे महिन्यात देशातील कार्यालयापासून लांब राहून घरातून काम शोधणाऱयांची संख्या 377 टक्क्मयांनी वाढली आहे. हा अहवाल जॉब साईट इंडीडने सादर केला आहे. याच कालावधीत वर्क फ्रॉम होमसाठी नोकऱयांचा वेग हा 168 टक्क्मयांनी वाढत राहिल्याचे दिसून आले आहे. नवीन कामाच्या पद्धती, नियम व वेळ यांची आगामी काळात सुरुवात होणार असल्याचे भाकीत इंडीड इंडियाने अहवालातून केले आहे आपले काम पूर्ण करण्यासाठी संबंधीत कार्यालयातच जाऊन काम करण्याची पद्धत काही प्रमाणात बदलण्याचे संकेत पहावयास मिळत आहे. नवीन कामाच्या पद्धती, नवीन नियम व वेळ यांची आगामी काळात सुरुवात होणार असल्याचे भाकीत इंडीड इंडियाचे अध्यक्ष शशि कुमार यांनी केले आहे.