प्रतिनिधी /बेळगाव
वाङ्मय चर्चा मंडळातर्फे 2021 चा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा व रंगभूमी दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी पार पडला. उत्कृ÷ साहित्यिकांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सांगली येथील रवी राजमाने, दि. बा. पाटील, विजय जाधव व अमरावती येथील डॉ. राजेंद्र राऊत यांना साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला लेखिका आशा रतनजी उपस्थित होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. वाङ्मय चर्चा मंडळाच्या प्रमुख नीता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. स्वाती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आशा रतनजी व संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद फडके यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर साहित्यिकांनी वाङ्मय चर्चा मंडळाचे व लढवय्या बेळगावकरांचे आभार मानले. ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांचाही सत्कार करण्यात आला.
ऍड. रुस्तम रतनजी यांच्या स्मृतींना हा कार्यक्रम अर्पण केला गेला. आशा रतनजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वाचनाची आवड कशी निर्माण झाली, तसेच आयुष्यात वाचन किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. माधव कुंटे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक ओऊळकर यांनी आभार मानले.
दुसऱया सत्रात स्वाती कुलकर्णी दिग्दर्शित ‘ऋतुंचे रूपरंग’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ओंकार तमुचे, अमेय पाटणेकर, तनिष जोशी, अंकिता कदम, तेजस्विनी सोमसाळे, संजीवनी गुर्जर यांनी साथ दिली. नीता कुलकर्णी दिग्दर्शित ‘नाटय़ चतुरंग’मध्ये माधव कुंटे, सुधीर शेंडे, चिन्मय शेंडे, श्रेया देशपांडे, नेहा जोशी, श्रेया सव्वाशेरी यांनी अप्रतिम नाटय़प्रसंग सादर केले. त्यांना रोहित गावडे याची गिटार साथ लाभली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल पाटणेकर, नीता कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी, रोहन दळवी, जगदीश कुंटे, विजय देशपांडे, अशोक ओऊळकर, माधव कुंटे, स्मिता कुलकर्णी, विक्रम फडके, अशोक अनगोळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.