अवघे जगच कोव्हिड-19 मुळे सैरभैर झाले आहे. दोनशेपेक्षा अधिक देशांवर संसर्गाचा परिणाम झाल्यामुळे कोणी कोणाला मदत करावी, हा प्रश्नच आहे. माणसे घराबाहेर पडत नाहीत आणि काहीजण कम्प्युटरवर घरातून काम करत आहेत. परंतु इलेक्ट्रीशियन, प्लंबर, चर्मकार, फेरीवाले अशा सर्वांना घराबाहेर पडूनच काम करावे लागते. त्या सर्वांची आता पंचाईत झाली आहे. स्थलांतरित मजुरांपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच उद्याचा दिवस कसा असेल, याची चिंता भेडसावू लागली आहे. दोन जागतिक महायुद्धापेक्षा हे संकट अधिक भयंकर आहे, असे जगातील अनेक तज्ञांचे मत आहे. नेहमीच वर्क फ्रॉम होम करणाऱया लेखकांच्या दृष्टीने हा तर कादंबरीचा विषय आहे. विचारवंत आणि मनोवैज्ञानिकांना याबद्दल वैचारिक लिखाण करावेसे वाटू शकेल. वैज्ञानिकांसाठी तर हा आव्हानात्मक काळ आहे आणि तेही याविषयी संशोधनात्मक लेखन करू शकतात. कोरोनामुळे आता लेखक विनोदी, विडंबनात्मक लिखाणापासून ते एकटेपणावरील ललित व चिंतनात्मक लिखाणापर्यंत वेगवेगळय़ा प्रकारचे लिखाण करायला लागले आहेत. व्हॉट्सअपवरून असे लिखाण फिरत असते. मात्र प्रकाशनक्षेत्रापुढली समस्या ही आहे, की सध्या पुस्तकांची दुकानेच बंद आहेत. कुरियर सेवा थांबल्यामुळे पुस्तके घरपोच पाठवणेही अशक्मय बनले आहे. नोटाबंदीनंतर मराठीच काय, एकूणच भारतीय प्रकाशन व्यवसायावर संक्रांत आली. आताची ही आपत्ती लेखक व प्रकाशकांच्या दृष्टीने महाभयंकरच म्हणावी लागेल.
पूर्वा जोशीपुरा या प्राण्यांसाठी काम करणाऱया पेटा इंडिया संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांनी नुकतेच ‘फॉर अ मॉमेंट ऑफ टेस्ट : हाउ व्हॉट यू ईट इम्पॅक्ट्स ऍनिमल्स, द प्लॅनेट अँड युवर हेल्थ’ हे पुस्तक लिहिले आहे. मांसाहाराचा आरोग्य व हवामान बदलावर काय परिणाम होतो, हा या पुस्तकाचा विषय आहे. पूर्वा सध्या ब्रिटनमध्ये असून, त्यांना या पुस्तकाच्या प्रचारासाठी भारतात यायचे होते. पण आता ते शक्मय नाही. देशातील काही बडय़ा बहुराष्ट्रीय प्रकाशनगृहांसाठी प्रकाश बुक्स ही कंपनी वितरणाचे काम करते. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यापासून देशातील पुस्तकांच्या दुकानांकडून येणारी मागणी निम्म्याने कमी झाली आहे. तर अमेझॉनसारख्या ऑनलाइन रिटेलर्सकडून येणारी मागणी सुमारे 25 टक्क्मयांपर्यंत कमी झाली आहे, अशी माहिती प्रकाश बुक्सचे व्यवस्थापकीय संचालक गौरव सभरवाल यांनी दिली आहे. याचे कारण स्पष्ट आहे. विमानतळ व मॉल्स बंद आहेत. तसेच क्रॉसवर्डसारखी बडी बडी दुकानेही सुरू नाहीत. मुंबई, चेन्नई, बेंगलोर, गुरुग्राम इथली ओम् बुक्स इंटरनॅशनलची पुस्तक भांडारे बंद झाली आहेत. हाच अनुभव ‘फुल सर्कल’ या पुस्तकांच्या रिटेल चेनचा आहे. देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर तर अत्यावश्यक सेवा सोडता, कोणतीच दुकाने सुरू नाहीत. तसेही लॉकडाउनपूर्वीच मुंबईत सर्वसाधारण दुकानांवर निर्बंध आले होते. विशेष म्हणजे, टपाल खात्याचेही काम जवळपास थांबले असून, त्यामुळे प्रकाशनगृहांची हाउस जर्नलही येण्याचे खंडित झाले आहे. त्यामुळे रोहन प्रकाशनच्या प्रदीप चंपानेरकर यांनी यावेळचा अंक समाजमाध्यमांद्वारे वितरित केला आहे. रोजची वर्तमानपत्रेही आता ऑनलाइन वाचायला मिळू लागली आहेत. जी शुल्क भरूनच ऑनलाइन वाचायला मिळू शकत होती, तीही मोफत मिळत आहेत. तसेच वाचकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे अनेक वृत्तपत्रांच्या लिंक्स वृत्तसंस्थांकडून स्वतःहून पाठवल्या जात आहेत. वास्तविक सध्या वर्तमानपत्रांचे वितरण खंडित झाले असल्यामुळे ज्या लोकांना छापील वृत्तपत्रे व मासिके वाचण्याची सवय आहे, ते लोक कंटाळले आहेत. परंतु याचा दुसरा एक फायदा असा होऊ शकतो की, यामुळे लोक पुस्तक वाचनाकडे वळू शकतील. नवीन पिढी समाजमाध्यमांवर जास्त असते. परंतु तेदेखील ई-बुकरीडरवरून अधिक प्रमाणात पुस्तके वाचतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. याचे कारण त्यांच्याकडेही आता मोकळा वेळ भरपूर आहे.
क्रॉसवर्ड, लँडमार्क, स्टारमार्क या रिटेल साखळी दुकानांच्या
केंद्रवर्ती गोदामात नवीन पुस्तके येत नाहीत. खरेतर, परीक्षा झाल्यानंतर एप्रिल-मेच्या
सुटीच्या काळात लहान मुलांच्या पुस्तकांचा जबरदस्त खप होतो. टायगर बुक्ससारख्या कंपन्यांनी
पाच-सहा नवीन पुस्तके आणली असली, तरी ती आता गोदामातच बंद राहणार आहेत. जी पुस्तके
लिहून व संपादित करून झाली आहेत, त्यांची
स्क्रिप्ट्स मुद्रक स्वीकारण्यास तयार नाहीत. कारण
ती केव्हा छापून होतील, हे मुद्रकांना नक्की सांगता येत नाही. फिंगर पिंट आणि वंडर
हाउस बुक्स या बडय़ा कंपन्यांनी आपल्या साठ नव्या पुस्तकांचे प्रकाशन लांबणीवर टाकले
आहे. पेंग्विन, रँडम हाउस इंडियालाही आपल्या पुस्तकांचे प्रकाशन पुढे ढकलणे भाग पडले
आहे. एकूण पुस्तकांच्या विक्रीत ई-बुक्सचे प्रमाण फक्त दोन ते तीन टक्के आहे. ऑडिओ
बुक्सच्या विक्रीचे प्रमाणही फार नाही. विशेष म्हणजे, पुस्तकांची प्रकाशने, इव्हेंट्स,
पॅरिस बुक फेअर, लंडन बुक फेअर हे सर्व रद्द करावे लागले आहे. इंग्रजी पुस्तकांच्या
प्रचाराकरिता पत्रकारांना मुलाखती दिल्या जातात. मात्र आता रेडिओ, टीव्ही तसेच वर्तमानपत्रांना
दिल्या जाणाऱया मुलाखती रद्द केल्या जात आहेत. त्याऐवजी फोन, स्काइप वा ई-मेलचा वापर
करावा लागतो आहे. जगप्रसिद्ध कादंबरीकार शुभांगी स्वरूप यांनी लॅटिटय़ूडेस ऑफ लाँगिंग
या कादंबरीसाठी जून महिन्यात विविध देशांचा दौरा आखला होता, तो त्यांनी रद्द केला आहे.
कवी आणि कादंबरीकार मीना कंडास्वामी या माझ्या आवडत्या लेखिका. त्यांनी जर्मनी व टोरँटो
येथील आपला दौरा रद्द केला आहे. यावेळी झालेल्या मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची
जुजबी विक्री झाली.
मुळात गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील पुस्तकांची दुकाने धडाधड बंद होऊ लागली. वाचनालयांची सदस्यसंख्या घटू लागली. काही अपवाद वगळल्यास, प्रकाशकांचा व्यवसाय तोकडा आहे. लेखकांशी लेखी करार करणे, करारानुसार त्यांना पुस्तकविक्रीचे सहामाही स्टेटमेंट देणे, रॉयल्टी वेळेवर देणे आणि ई-पुस्तक विक्री वा अन्य हक्कांसाठी करारात स्वतंत्र तरतूद करणे, या गोष्टी केल्याच जात नाहीत. बहुसंख्य प्रकाशक लेखकांची रॉयल्टी बुडवतात. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत अशा अनेक नामवंत लेखकांना बडय़ा प्रकाशकांचा अतिशय वाईट अनुभव आला आहे. तरीसुद्धा हे प्रकाशक वर्तमानपत्रात त्याच लेखकांवर लेख लिहितात. ज्यांच्यावर प्रकाशकांनी अन्याय केला आहे, त्या प्रकाशकांच्या गौरवार्थ लेख या ना त्या निमित्ताने प्रसिद्ध होत असतात. वेगवेगळय़ा निमित्ताने हे प्रकाशक वर्तमानपत्रातून प्रसिद्धीच्या झोतात राहतात. समाजात प्रति÷ा मिळवून असतात. आता कोरोनामुळे लेखकांना आणखी वाईट दिवस येण्याची शक्मयता आहे.
मात्र ही आर्थिक बाजू जरी वेगळी काढली, तरी आता कोरोनाचे कुटुंबावर होणारे तसेच सामाजिक परिणाम हे वेगवेगळय़ा प्रकारचे असतील. एकीकडे पुरुष सक्तीने घरी राहत आहेत. घरचा व बाहेरचा ताण सहन करणारी स्त्री आता घरीच राहत आहे. यामुळे कुटुंबातील संवाद वाढला आहे. मोलकरणी कामावर येत नसल्यामुळे, कुटुंबातील सर्वांना घरकामात मदतीचा हात द्यावा लागत आहे. लहान मुलांपासून थोरामोठय़ांपर्यंत अनेकांना रिकाम्या वेळेचे काय करायचे असाही प्रश्न पडला आहे. असंख्य लोकांचे मानसिक आरोग्यही ढळत आहे. या परिस्थितीमुळे लेखकांना नवे विषय मिळत आहेत. लेखक आणि प्रकाशक यांच्यात फरक असतो. आजही बहुतेक लेखक हे मनापासून लिहावेसे वाटते म्हणून लिहितात. मग पैसे मिळोत अथवा न मिळोत. अजून लेखनसंस्कृतीचा मात्र लॉकडाउन नाही. कोरोनामुळे लेखकांच्या डोक्मयात नवनवीन किडे तर वळवळू लागतील, अशी अपेक्षा आहे.
पूर्वा जोशीपुरा