प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा येथील एअरमन टेनिंग सेंटरच्यावतीने स्वर्णीम विजय वर्ष साजरे करण्यात आले. 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर फिरणारी विजयी ज्योत एअरमन टेनिंग सेंटरमध्ये आली होती. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला निवृत्त वीरचक्र प्राप्त एअरव्हाईस मार्शल मोहन दीक्षित उपस्थित होते. एअरमन टेनिंग स्कूलचे एअर कमांडिंग ऑफिसर एस. डी. मुकूल यांनी या विजयी ज्योतीचे स्वागत केले. भारतीय नौदलाने केलेल्या साहसपूर्ण कामगिरीमुळे पाकिस्तानबरोबर युद्ध जिंकण्यास मदत झाल्याचे एअर व्हा. मार्शल मोहन दीक्षित यांनी सांगितले. यानिमित्त आकर्षक पद्धतीने मराठा लाईट इन्फंट्रीचे बँण्डवादन झाले. यावेळी एअरमन टेनिंगचे वरि÷ अधिकारी व जवान सहभागी झाले होते.