प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर मंगला एक्स्प्रेस सर्वप्रथम 1 जूनपासून निजामुद्दीन ते रत्नागिरी या दरम्यान विजेवर धावणार आहे. यामुळे प्रवास वेगवान व प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने तसे संकेत दिले असून तयारीही करण्यात आली आहे. रोहारत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर सुरुवातीला इलेक्ट्रिक लोकोची चाचणी झाली. विजेवर धावणाऱया गाडय़ांसाठी हा मार्ग सज्ज झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी पथकासह मार्गाची सुरक्षा तपासणी केली. यानंतर काही मालगाडय़ा विजेवर धावत होत्या. मात्र प्रवासी वाहतुकीसाठी त्याचा वापर झाला नव्हता. 1 जूनपासून त्याचाही शुभारंभ करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.