डॉ. मनोज कामत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ फोंडा
आजच्या डिजीटल युगातही श्रीमंतासह प्रत्येक गरिब पालक आपल्या पाल्याला शिक्षण या ज्ञानार्जनाच्या माध्यमातून उच्च शिखर गाठण्यासाठी परावृत्त करतो हाच खरा शिक्षणाचा सन्मान आहे. हे कार्य तडीस नेण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्सहन देणाऱय़ा राजेश वेरेकर यांनी फोंडा फर्स्टच्या माध्यामातून अखंडीपणे सुरू ठेवणे हे उल्लेखनिय कार्य असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन प्रा. डॉ. मनोज कामत यांनी केले. फोंडा फस्ट या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
फोंडा येथील राजीव कला मंदिरच्या मा. दत्ताराम सभागृहात काल रविवारी झालेल्या या सोहळय़ात दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर फोंडा फस्टचे अध्यक्ष राजेश वेरेकर, सचिव कल्पेश पारकर, पालकांचे प्रतिनिधी प्रवीण पार्सेकर, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी अमेय तिळगूळ उपस्थित होते.
क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुलेंचे कार्य न विसरण्य़ाजोगे
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी होणे हा सुवर्ण योग आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱया व मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱया सावित्रीबाईंचे योगदान प्रत्येक विद्यार्थ्यांने कायम स्मरणात ठेवावे. आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण केवळ अर्थाजनाचा पुढील मार्ग म्हणून बघू नये विद्यार्थ्याने ज्ञानार्थी बनावे असे आवाहन डॉ. कामत यांनी केले.
यावेळी बोलताना बारावीतील गुणवंत विद्यार्थी अमेय तिळगूळ यांनी परीक्षेसाठी आपण आत्ससात केलेल्या खास उजळणीविषयी विद्यार्थ्यासमोर अनुभव कथन केला. पालकांचे प्रतिनिधीत्व करणाऱया प्रवीण पार्सेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आज आधुनिक दृष्टीकोनातून जगाकडे बघावे असे आवाहन केले.
कर्मभूमी कूठेही असू दे जन्मभूमीला विसरू नका-राजेश वेरेकर
आजच्या विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीतही सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. आज शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यानी उद्योजकतेवर भर देताना स्वत: दुसऱयासाठी रोजगार निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे. उच्चशिक्षणानंतर कर्मभूमी कुठेही असली तरी आपल्या जन्मभूमीबद्दल नेहमी आदर बाळगावा असे आवाहन राजेश वेरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना केले. यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
दहावी व बारावीच्या एकूण 200 गुणवंत विद्यार्थ्याना यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले. कल्पेश पारकर यानी आभार मानले. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यासह पालक व संस्थेचे हितचिंतक कोरोना सुरक्षा नियम पालन करीत मोठय़ा संख्येने उपस्थित होते.