दंड वसूलीत 2016 नंतर 38.57 टक्क्मयांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेकडून 2016 ते 2020 या कालावधीमधील चार वर्षात विना तिकिट प्रवास करणाऱया प्रवाशांकडून जवळपास 1938 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 2016 नंतर दंड वसूलीमध्ये 38.57 टक्क्मयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. रेल्वेकडून एका माहिती अधिकारात मध्यप्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ता च्ंाद्रशेखर गौर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना हा खुलासा करण्यात आल्याचे सांगितले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वित्त वर्ष 2019-20 मध्ये विना तिकिट प्रवाशांकडून 561.73 कोटी रुपयांचा दंड प्राप्त केला आहे. हा दंड 1.10 कोटी इतक्मया प्रवाशांकडून वसूल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. वित्त वर्ष 2018-19च्या तुलनेत सदर दंड वसूलीमध्ये 6 टक्क्मयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
आरपीएफ सदर प्रवाशांच्या विरोधात रेल्वे कायद्याच्या कलम 137 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर सादर करते आणि या प्रकारच्या प्रवाशाकडून जवळपास 1 हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो.
1.78 कोटींची तिकिटे रद्द
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे रेल्वेला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये मार्चपासून रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने आतापर्यंत जवळपास 1.78 कोटींची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. तिकिट रद्द केल्याने रेल्वेने प्रवाशांना जवळपास 2727 कोटी रुपयांचा परतावा केला असल्याची माहिती दिली आहे.