नवी दिल्ली
भारतीय हवाई कंपन्यांना पुढील काळात एकूण क्षमतेपैकी 60 टक्के क्षमतेत प्रवासी घेण्यासाठी 24 फेबुवारी 2021 पर्यंत मुदत सरकारने वाढवून दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता 60 टक्केच प्रवासी विमानात घेण्याचे बंधन सरकारने घातले आहे. यापूर्वी वरील आदेश हा 24 नोव्हेंबरपर्यंत अंमलात येणार होता. आता या मुदतीत आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात 2 महिने विमानसेवा बंद होती. त्यानंतर 25 मेपासून स्थानिक स्तरावर विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यावेळी हे प्रमाण 33 टक्के इतके होते.