वाढत्या उष्म्याचा परिणाम : विविध फळांची मोठय़ा प्रमाणावर आवक, मागणीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
वाढत्या उष्म्यामुळे फळ-भाज्या आणि फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रुटमार्केटमध्ये फळांची आवकही अधिक प्रमाणात वाढली आहे. विशेषतः फळ आणि फळांचे रस यांना मागणी वाढल्याने दैनंदिन उलाढाल वाढली आहे. त्यामुळे प्रुटमार्केट आणि किरकोळ बाजारही फळांनी बहरला आहे.
बाजारात फळांची आवक आणि मागणी देखील वाढल्याने शहरासह चौका चौकात फळाची विक्री सुरू आहे. विशेषतः केळी, सफरचंद, डाळींब, पेरू, संत्री, मोसंबी, कलिंगड आदी फळांची रेलचेल सुरू आहे. मागील दोन वर्षात हंगामातच कोरोनाचा प्रकोप वाढल्याने प्रुटमार्केटवर मोठा परिणाम झाला होता. दैनंदिन उलाढाल 50 लाखांतून 5 लाखांवर घसरली होती. मात्र यंदा कोरोना काहीप्रमाणात कमी झाल्यानंतर फळबाजारपेठ सुरळीत झाली आहे. शिवाय उलाढाल पूर्वपदावर आली आहे. होलसेल प्रुटमार्केटमध्ये 8 किलो द्राक्षे 200 ते 400 रुपये, 10 किलो इराणी ऍपल 700 ते 1100 रुपये, एक किलो कलिंगड 8 ते 12 रुपये, एक किलो डाळिंब 30 ते 100 रु., एक पेटी आंब्याचा दर 200 ते 1500 रु., तर चिकू शेकडा 200 ते 600 रु. असा दर आहे. सीमाहद्दीवर आरटीपीसीआरची सक्ती मागे घेण्यात आल्यानंतर परराज्यातून देखील फळांची आवक वाढली आहे. आंब्यांचा हंगाम देखील सुरू झाल्याने किरकोळ प्रमाणात आंबे बाजारात दिसत आहेत. प्रुटमार्केटमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ आणि इतर ठिकाणांहून फळांची आवक होत असते. वाढत्या उन्हामुळे फळांची मागणी वाढली आहे. यामध्ये विशेषतः कलिंगड, सफरचंद, संत्री, मोसंबी, पपई, दाक्षे या फळांची विक्री सुरू आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होलसेल प्रुटमार्केट हंगामामध्ये बहरताना दिसत आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे भर हंगामातच प्रुटमार्केट थंड पडले होते. त्यामुळे व्यापारी आणि विपेत्यांना फटका बसला होता.
परराज्यातून फळांची आवक
वाढत्या उन्हामुळे फळांना मागणी वाढली आहे. होलसेल फळ बाजारात विविध फळांची आवक देखील होत आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर फळ बाजार बहरल्याचे दिसत आहे. परराज्यातूनदेखील आवक वाढत आहे.
शरीफ के. धारवाड (होलसेल प्रुटमार्केट असोसिएशन अध्यक्ष)