प्रतिनिधी /बेळगाव
समाजात असंख्य प्रमाणात विसंगती आणि विषमता आहे. ती दूर करण्यासाठी नव्या पिढीने समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे विचार रोटरीचे माजी जिल्हा प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या आजीव सभासद सदस्यांसाठी एकदिवसीय शिबिर व विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आयएमएच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी अशोक बदामी होते. व्यासपीठावर डॉ. एस. बी. कुलकर्णी, खजिनदार आनंद जिगजिन्नी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
स्वागत अशोक नाईक यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी केले. विनोदिनी शर्मा व प्रिया पुराणिक यांनी परिचय करून दिला. यावेळी व्ही. एल. देसाई, प्रा. ए. एस. गोडसे, प्रा. पी. एस. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अवधुत माणगे यांनी केले. आभार प्रवीण हिरेमठ यांनी मानले.