वेंगुर्ले आगार व्यवस्थापक जी. एस. चव्हाण यांची माहिती
वार्ताहर / वेंगुर्ले:
विभागीय कणकवली कार्यशाळेकडून आलेल्या आदेशानुसार वेंगुर्ले आगारातून 22 मेपासून वेंगुर्ले आगारातून दोन गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ा 44 आसनी असून वाहकासाठी एक आसन असल्याने 21 प्रवाशांनाच बसमध्ये घेतले जाणार आहे. प्रवाशांना मास्क तोंडावर बांधणे आवश्यक आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाणार आहे. प्रवासाचे तिकीट जे पूर्वी होते तेच राहणार आहे.
वेंगुर्ले आगारातून पहिली बस सकाळी सात वाजता वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी जाईल. ती सावंतवाडीतून 8.15 वाजता सावंतवाडीतून तुळसमार्गे वेंगुर्ले येथे येण्यास सुटेल. हीच बस पुन्हा सकाळी 9.30 वाजता वेंगुर्ले मठमार्गे कुडाळ अशी जाईल. येताना कुडाळहून 11 वाजता कुडाळ मठमार्गे वेंगुर्ले अशी सुटेल. हीच बस दुपारी 2 वाजता वेंगुर्ले दाभोलीमार्गे कुडाळ अशी जाईल व कुडाळ येथून दुपारी 3.10 वाजता कुडाळ दाभोलीमार्गे वेंगुर्ले अशी सुटेल.
वेंगुर्ले आगारातून दुसरी बस सकाळी 8.45 वाजता वेंगुर्ले मठमार्गे सिंधुदुर्गनगरी अशी जाईल. तीच बस दुपारी 12 वाजता सिंधुदुर्गनगरी येथून मठमार्गे वेंगुर्ले अशी सोडण्यात येणार आहे. हीच बस दुपारी 1.45 वाजता वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी अशी जाईल व सावंतवाडीतून दुपारी 3 वाजता तुळसमार्गे वेंगुर्ले अशी सुटेल. सायंकाळी 5.15 वाजता वेंगुर्ले येथून मठमार्गे सिंधुदुर्गनगरी अशी जाईल व सिंधुदुर्गनगरी येथून सायंकाळी 6.25 वाजता मठमार्गे वेंगुर्ले अशी सुटेल व ती सायंकाळी 7.30 वाजता वेंगुर्ले येथे पोहोचेल.
विभागीय कार्यशाळेने केलेल्या सूचनांनुसार हे नियोजन केलेले आहे. या प्रवासी बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक जी. एस. चव्हाण यांनी केले आहे.