प्रतिनिधी / वेंगुर्ले:
उत्तरप्रदेश लखीमपूर येथील हिंसाचारात झालेल्या शेतकऱयांच्या मृत्यूच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणा देत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांना सादर केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता कुबल, प्रज्ञा परब, मच्छीमार नेते हेमंत मलबारी, नगरसेवक संदेश निकम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, नगरसेविका अस्मिता राऊळ, शिवसेना शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, स्वप्नील राऊळ, वामन कांबळी, नगरसेविका कृतिका कुबल, सुरेश भोसले, प्रशांत परब, पंकज शिरसाट, रोहन वराडकर, नगरसेवक आत्माराम सोकटे, नितिन कुबल आदी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
उत्तरप्रदेशातील ललीमपूर खिरी येथे केंद्र सरकारमधील गृह राज्यमंत्री अजय मिश्ा्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांनी शेतकऱयांच्या मोर्चातील समुहावर जाणिवपूर्वक गाडय़ा घालून शेतकऱयांच्या हत्या केल्याची घटना घडली आहे. या गंभीर घटनेची दखल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी घेतलेली नाही. उलट गुन्हेगारांना अभय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. तसेच उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून राजरोस गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतलेली आहे. परंतु मोदी सरकारमधील गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत. मोदी शासन त्यावर कोणतीही भूमिका स्पष्ट करीत नाही. मोदी सरकारच्या हिटलरशाहीचा आम्ही निषेध करतो, असे सांगत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.