प्रतिनिधी /बेळगाव
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे लागून ही भटकी कुत्री वाहनधारकांना पाडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहर परिसरासोबतच उपनगरी भागातही भटक्मया कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांना समस्या निर्माण झालेली आहे. ही भटकी कुत्री अन्नाच्या शोधात इतरत्र भटकत असून कचरा कुंडीतील कचरा विस्कटत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
ही भटकी कुत्री रात्री-अपरात्री घोळका करून ओरडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या भटक्मया कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस दुपटीने वाढ होत आहे. त्यामुळे कुत्र्यांची नसबंदी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.