50 टक्के विद्यार्थी बोलविण्याचा विचार, पालकांकडून मागविला अभिप्राय
बेळगाव / प्रतिनिधी
मागील अनेक महिन्यांपासून बंद असणाऱया शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी नवा फार्म्युला पुढे येत असून 50 टक्के विद्यार्थ्यांना घेऊन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. शाळा व्यवस्थापनांनी पालकांना याची कल्पना दिली असून पालकांकडून अभिप्राय मागविण्यात येत आहे. याला पालकांनी प्रतिसाद दिल्यास लवकरच शाळा सुरू होण्याचा मार्ग खुला होईल.
मार्च महिन्यात कोरोनाचे संकट राज्यभर वाढू लागल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्यात आले. जुलै महिन्यात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. निदान ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी काही पालकांकडून होत आहे. ऑनलाईन शिक्षण दिले जात असले तरी ऑफलाईन शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे.
काय आहे 50 टक्के फॉर्म्युला
शाळांमध्ये सामाजिक अंतर राखता येणे अशक्मय होते. यासाठी शाळांनी 50 टक्के उपस्थितीत आठवडय़ातून दोन किंवा तीन दिवस तर उर्वरित मुलांना इतर दिवस शाळांमध्ये बोलावण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसविणे शाळांनाही शक्मय होणार आहे. तसेच विद्यार्थी शाळांपर्यंत आल्याने अभ्यासक्रम लवकर शिकविला जाईल, असे मत शाळा व्यवस्थापनाने पालकांना कळविले आहे.
काही पालकांचा मात्र आक्षेप
बेळगावमधील काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी पालकांना बोलावून त्यांचे अभिप्राय मागविण्यास सुरुवात केली आहे. काही पालकांनी या फॉर्म्युल्याला सहमती दर्शवली असली तरी काहींनी मात्र कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरेपर्यंत ऑनलाईनच शाळा सुरू ठेवा, अशी मागणी केली. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोक्मयाची ठरू शकते असा अंदाज तज्ञांकडून वर्तविला जात असल्याने काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास आक्षेप घेतला. सर्व पालकांचा अभिप्राय घेतल्यानंतरच शाळा सुरू होण्याचा मार्ग खुला होणार आहे.