प्रतिनिधी/ बेळगाव
शाहूनगर येथील साई मंदिरात नुकताच कार्तिकोत्सव पार पडला. यावेळी मंदिराचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. प्रा. राजशेखर मल्लण्णावर व बिम्सचे एस. डी. माने यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले.
दीपपूजन व प्रज्वलनानंतर भाविकांनी मंदिरात दीप आरास केली. सायंकाळी सात वाजता साईंची धुपारती झाली. त्यानंतर तुलसीविवाह कार्यक्रम झाला. यावेळी शिवाजी पावले, भरत होनगेकर, नंदकुमार मोरे, मल्लेशी कांबळे, भरमा कोनेरी, विजय सुभानजी, बाळकृष्ण सुर्वे, दीपक मन्सूरकर आदींसह साई युवक मंडळ व इतर साईभक्त उपस्थित होते.