प्रतिनिधी/ सातारा
येत्या 31 मार्चपर्यंत सर्वच शाळांना कोरोना काळातही आधार नोंदणी करण्याची सक्ती शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या आधार कार्डची दुबार नोंदणी करण्यात आल्यामुळे एकाच विद्यार्थ्याला दुसऱयांदा लाभ मिळाल्याचे पुढे आले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश, पाठय़पुस्तक योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ देताना शासनाकडे लाभास अनुदेय विद्यार्थ्यांची परिपूणं माहिती शिक्षण विभागाच्या सरल संकेतस्थळावर उपलब्ध असण्याच्या दृष्टीने आणि संबंधित लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीत नोंदविणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईपर्यंत आधार नोंदणी करता उपलब्ध असलेल्या पर्यायी व्यवस्थेचा वापर करून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि सरलमध्ये अद्यावतीकरण करण्याचे काम शाळांनी 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांना दिले आहेत. अद्यापही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत नोंदविणे प्रलंबित आहेत. काही विद्यार्थ्यांची दुबार नेंदणी झाल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे. काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. या सर्व बाबीवर आळा घालण्यासाठी सर्व मुलांचे आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. दरम्यान, जिह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी सरल प्रणालीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या मुख्याध्यापकांकडून आढावा घेण्यात येत असल्याचे माध्यामिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.