शैलेंद्र वेलिंगकर यांचा विश्वास
प्रतिनिधी /पणजी
लोकनियुक्त सरकारचा निकाल आज ठरणार आहे. गोव्यात राजकीय मूल्यांचे हनन झाले आहे. घोडेबाजारांची पद्धत भाजपने जी गोव्यात रूजविली त्याचा नाश होण्याची गरज आहे. आजच्या निकालावरून पुढील सरकारची दिशा ठरणार आहे. गोवा विधानसभा ही त्रिशंकू असेल. याशिवाय राज्यातील गढूळ राजकारण साफ करण्यासाठी गोवा शिवसेना कटीबद्ध आहे. याचबरोबर राज्यातील दोन किंवा तीन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेना उपराज्यप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी राज्यकार्यकारिणी सदस्य सुनिल सांतिनेजकर, उत्तर गोवा जिल्हाप्रमुख सुशांत पावसकर उपस्थित होते.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान झाले. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने भरपूर संभ्रम अवस्था झाली होती. आता कोरोना कमी होत असल्याने सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकार घेत आहेत. चार पाच शैक्षणिक संस्थानी निवेदन दिले आहे की त्यात पालक ते आपल्या मुलांना शाळेत पाठविल्यानंतर कोणत्याही प्रकारची बाधा झाली तर ती जबाबदारी पालकांची असेल अशाप्रकारचे असंवेदनशील आणि आत्मघाती असे निवेदन सर्व शाळांमध्ये पसरले होते. त्यानंतर शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी शिवसेनेनी केलेली मागणी पूर्ण करून परिपत्रक मागे घेतले आहे.