विनामास्क फिरणाऱया 282 जणांवर गुन्हा
बेळगाव : लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांची वाहने जप्त करण्याचा धडाका पोलीस प्रशासनाने सुरू केला आहे. याचबरोबर विनामास्क फिरणाऱयांवरही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शुक्रवारी विनाकारण फिरणाऱयांकडील 52 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर विनामास्क फिरणाऱया 282 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊन काळात मार्गसूची जारी करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न अनेकांकडून होत आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. शुक्रवारी विनाकारण फिरणाऱयांकडून 52 वाहने जप्त केली आहेत. यापूर्वीही अशाच प्रकारे वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतरही वाहन चालक बेजबाबदारपणे घराबाहेर पडताना दिसत आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना मास्क घालण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोलिसांनी मास्क न घालता फिरणाऱयांवरही गुन्हे नोंदविले आहेत. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.