ऑनलाइन टीम / सोलापूर :
सरकार बदलले मात्र धोरण बदलले नाही, त्यामुळे शेतकऱयांच्या आत्महत्येची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शेती उद्योगातील क्रांतीचे श्रेय घेणाऱया शरद पवारांनी शेतकऱयांच्या आत्महत्यांचीही जबाबदारीही स्वीकारावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली.
15 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे कै. बबनराव काळे याच्या स्मरणार्थ शेतकरी संघटनेची कार्यकारणी व्यापक स्वरूपाची करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याची माहिता सोलापूर जिह्यातील शेतकऱयांना देण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सोलापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसे अपश्रेय घेणेही गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार आहेत. सरकार तेच आहे मात्र नाव बदलले आहे. राज्य सरकारमधील नाव बदलली आहेत. बाकीचे सर्वकाही तसेच आहे.