हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची भीतीः शेतकरीवर्ग हतबल : ओला दुष्काळ जाहीर करा : आर्थिक मदतीची अपेक्षा
वार्ताहर /सांबरा
तालुक्मयाच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक पावसामुळे वाया जाणार असल्याने शेतकरीवर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे. यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, माविनकट्टी, पंतबाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी आदी गावांतील भातपिके पंधरा-वीस दिवसांपूर्वीच कापणीसाठी आली आहेत. मात्र, वारंवार तयार होणाऱया ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयांनी भातपिके कापण्याचे धाडस केले नव्हते. मात्र, भाताची लोंबे झडू लागल्याने शेतकऱयांनी धीर घट्ट करून अखेर भात कापणीचा निर्णय घेतला. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱयांच्या भाताच्या गंज्या, कापलेल्या भातपिकासह उभे पीकही पाण्यात सापडले आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक भातपिकाचे नुकसान होणार असून शेतातील पुढील सर्व कामांनाही विलंब होणार आहे. याचा परिणाम कडधान्य पेरणीवर होणार असून तो हंगाम वाया जातोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरवषी साधारण दिवाळीनंतर आठ-दहा दिवसात सुगी हंगाम संपविला जातो. मात्र, यावषी पावसाने वारंवार सुगी कामात व्यत्यय आणल्याने निम्म्याहून जास्त भात पिकाची कापणी शिल्लक आहे. कापलेले भातपीक पावसात सापडल्याने पूर्णपणे खराब होण्याची शक्मयता आहे. बऱयाच शेतकऱयांच्या भाताच्या गंज्यांना पाण्याने वेढा घातला आहे. कापणीला आलेल्या भातपिकाची मुदत संपल्याने व कापणी पुन्हा लांबणीवर पडल्याने नुकसान होण्याची शक्मयता आहे. बळीराजा पिकांची काळजी तळहातावरील फोडाप्रमाणे घेतो. मात्र, पावसाने हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतल्याने शेतकऱयांवर मोठे संकट कोसळले आहे.
पावसाचा मोठा फटका शेतकऱयांना
भात पेरणीचा खर्च, बियाणांचा खर्च, भांगलण व खते आदीसाठी शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. त्याचा परतावा मिळण्याचे वेळी अशा प्रकारे नुकसान सोसावे लागत असल्याने दरवषी शेतकऱयाची अधोगती होत आहे. वारंवार शेतकऱयांना नुकसान सोसावे लागत असल्याने त्यांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. मंगळवारी रात्रीच्या पावसाने पुन्हा शेतवडीत मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले असून नाले भरून वाहू लागले आहेत. शिवारातील पाणी लवकर कमी होणार नसल्याने भातकापणी लांबणीवर पडणार आहे. याचा फटका मात्र शेतकऱयांना बसणार आहे. यासाठी संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
शासनाचे पाठबळ आवश्यक
बसवन कुडची भागातील भातपिके गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वीच कापणीला आलेली आहेत. मात्र, वारंवार निर्माण होणाऱया ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयांनी भातकापणी लांबणीवर टाकली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच या भागातील शेतकऱयांनी भात कापणीचा निर्णय घेतला. मंगळवारी झालेल्या पावसामुळे सर्व भातपिके पावसात सापडली आहेत. यामुळे शेतकऱयांना जबर धक्का बसला असून शेतकरीवर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे. या पावसामुळे कडधान्य पेरणीचा हंगामही वाया जातोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे.
– बाबू होरकेरी
दिलासा देणे गरजेचे
पावसाने शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेली भातपिके हिरावून घेतली आहेत. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून पिकवलेले भातपीक पूर्णपणे वाया जाण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. शेतकऱयांना सावरण्यासाठी सरकारने तातडीने भातपिकांची पाहणी करून नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. तरच शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
– भरतेश चौगुले