छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय
कोल्हापुर / प्रतिनिधी
मागील काही काळात महापूर, कोरोना, अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. केंद्र सरकारने एक रकमी एफआरपी देण्याचे स्पष्ट केले असेल तरी राज्य सरकारने अजून कोणतीच भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागलच्या वतीने घेण्यात आला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरी केंद्रीत विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे. असे समर्जीत घाटगे यांनी सांगितले.