प्रतिनिधी/ बेळगाव
न्यायालय आवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच वकिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ चौकपर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. काम सुरू करून जवळपास तीन महिने उलटले तरी काम काही पूर्ण झाले नाही. आता एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा कंत्राटदाराने तातडीने काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. पक्षकारांना आणि सर्वसामान्य जनतेला न्यायालयामध्ये प्रवेश नाही. त्यामुळे पक्षकारांना रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा तातडीने हा रस्ता करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.