संस्कारक्षम बेळगावातील धक्कादायक वास्तव्य
प्रतिनिधी/ बेळगाव
स्थळ- बेळगाव… जिल्हा न्यायालय आवार…
ठिकाण- एका वकिलाचे कार्यालय…
वादी- तिसऱयांदा विवाहित महिला…
कारण-तिसऱया घटस्फोटाचे…
खर्च करणारी व्यक्ती म्हणजे त्या स्त्राrचा चौथा नवरा. वाचून धक्का बसला ना? ही कोणत्याही देमार चित्रपटातील किंवा रटाळ टी. व्ही. मालिकेची कथा नाही तर आपल्याच बेळगावात घडणारे हे वास्तव आहे. केवळ पैशाच्या मोहापायी एकापेक्षा अनेक विवाह करण्याचा व्यवसायच काही महिलांच्या टोळक्मयांनी सुरू केला आहे. जाळय़ात ओढायचे, लग्न करायचे, एक-दीड वर्षात घटस्फोट घ्यायचा आणि दुसऱयाला नादी लावायचे असे हे दुष्टचक्र सुरू आहे.
प्रेम, लग्न, विवाह, संसार या गोष्टींना एक वेगळीच प्रति÷ा असते. समाजात प्रेमविवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोनही आज बदलला आहे. विवाह ही एक संस्कृती, काही कारणाने न पटणे किंवा अन्य कारणास्तव दुसरा विवाह करणे, निवडणे ही सामाजिक प्रवृत्ती. मात्र पैसे लाटण्याच्या उद्देशाने अनेकांनेक विवाह करीत जाणे ही विकृती होय. अशा विकृतीला बळी पडलेल्या महिला समस्त स्त्राrवर्गाला नाहक बदनाम करत आहेत.
नियोजनबद्ध चालबाजी
एखाद्याला प्रेमाच्या जाळय़ात ओढायचे, त्याच्याशी लग्न करायचे. त्यानंतर पतीची किती मालमत्ता आहे याची चाचपणी करायची. त्यातील काही मालमत्ता स्वतःच्या नावे करायची, याचबरोबर त्याच्याकडे पैसा किती आहे तो पैसा देखील घ्यायचा. केवळ स्वतःसाठीच नाही आपल्या माहेराकडील बहीण, भाऊ यांच्यावर देखील पतीचाच पैसा उधळायचा. एकूणच स्वतःबरोबर आपले माहेर देखील उजळवून टाकायचे. यामुळे तरुण भरडले जात आहेत. मोठय़ा कष्टाने पैसा कमवायचा आणि पत्नीच्या प्रेमापोटी तो उधळायचा. पैसा कमी पडला की पतीबरोबर तक्रार करायची आणि थेट घटस्फोटापर्यंत मजल मारायची. असा प्रकार घडत आहे. अत्यंत नियोजनबद्धरित्या चालबाजी करायची आणि केवळ एकच नाही तर तीन ते चार वेळा विवाह करायचे असा एकूणच विवाह संस्थेला गालबोट लावणारा प्रकार सध्या शहरात सुरू आहे.
कायद्याचा दुरुपयोग करुन लाभ उठवायचा
स्त्राrवर नेहमीच अन्याय होत आला आहे, हे वास्तव आहे. यामुळेच अशा अन्यायांना प्रतिबंध करण्यासाठी, स्त्राrच्या संरक्षणासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. त्या कायद्याचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधील पीडीत स्त्राrला न्याय मिळावा यासाठी वेगवेगळे कायदे अंमलात आणण्यात आले. महिलांच्या रक्षणासाठी हे कायदे करण्यात आले. पण त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. स्त्राrयांवर अत्याचार होवू नये, तिला सक्षम बनविण्यासाठी कायद्यांची तरतूद झाली. मात्र यामुळे तेच कायदे पुरुषांवर मात्र अन्यायकारक होताना आता समोर येत आहे.
विवाहाचा अर्थच बदलण्याचा प्रयत्न
विवाह हा दोन कुटुंबांबरोबरच व्यक्तींना जोडला जातो. दोन व्यक्तीच नाही तर या विवाहामुळे त्यांचे नातेवाईकही जोडले जातात. विवाह हा सामाजिक बंधन दृढ होण्याचा मार्ग आहे. विवाह हे एक पवित्र बंधन आहे. मात्र या पवित्र बंधनाला धोका देण्याच्या घटना वेळोवेळी उघडकीस येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पवित्र बंधनाला अशा प्रकारे जर व्यवसायिक स्वरुप प्राप्त होत असेल तर ते समाज हिताच्या दृष्टिने घातक आहे. यासाठी आता काही स्त्राrयांनीच पुढे येवून मार्गदर्शन करणे ही काळाची गरज बनली आहे.
वकिलांबरोबर न्यायाधीशही हताश
महिलांच्या बाजूने कायदे सक्षम असल्यामुळे पुरुषांच्या बाजूने लढणारा वकिल देखील कमजोर बनतो. कारण कायद्यानेच महिलांना संरक्षण आणि न्याय देण्याच्या बाबतीत मोठा आधार दिला आहे. त्या आधाराचा फायदा घेत अशा काही मोजक्मया स्त्राrया त्याचा दुरुपयोग करत आहेत. न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी भावी पती देखील तिच्या सोबत असतो. हे देखील अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. घटस्फोट घेण्यासाठी लागणारा खर्च भावी पतीच करतो. मात्र तो देखील त्यामध्ये फसत आहे हे त्याला समजत नाही.
काही वकील प्रारंभी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेवटी नाईलाजास्तव त्यांनी न्यायालयात त्या महिलेच्या बाजूने आपली वकालत दाखल करतात. तिसऱया ते चौथ्यावेळी घटस्फोटासाठी आल्यामुळे काही वेळा न्यायाधीशांनाही हा अतिरेक असल्याचे समजते. मात्र न्यायाधीश देखील काहीच करु शकत नाही. कारण कायद्याच्या विरोधात जावून न्याय देणे त्यांनाही अशक्मय असते. त्यामुळे वकील आणि न्यायाधीश त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घटस्फोट देत असतात.
मुलींचे घटते प्रमाण प्रमुख कारण
मुलींची संख्या जशी कमी झाली तशा मुलींच्या पालकांच्या आणि मुलींच्याही अपेक्षा वाढल्या. महत्त्वाचे म्हणजे मुलांपेक्षाही मुलींवर आई-वडिल अधिक प्रेम करत आहेत. त्यामुळे मुला, मुलींमध्ये संस्कार रुजणे अवघड झाले आहे. आई-वडिलांनी एखादे स्थळ निवडले तरी त्याला विरोध करुन मला हवा आहे तसाच मी मुलगा निवडणार असे सांगून मुली नकार देत आहेत. मात्र त्यांनी निवडलेला सोबती त्रासदायक निघाल्यानंतर घटस्फोट सारख्या टोकाच्या भूमिकेला मुली जात आहेत. त्याचवेळी तुझे तू ठरवलेस म्हणून पालकही जबाबदारी झटकत आहेत. दरम्यान काही मुलींनी तर विवाह म्हणजे आर्थिक लाभ उठविण्याचे निमित्त असे समजून त्याला व्यवसायिक स्वरुप दिल्याचे पहायला मिळत आहे.
सध्याच्या धावत्या युगामध्ये जीवन इतके जलद झाल्याने वेळेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. केवळ पैशासाठी ही धाव सुरू आहे. मात्र यामुळे सामाजिक समतोल बिघडत आहे. पूर्वी सासरच्या जाचाला कंटाळून महिला घटस्फोट घेत होत्या. या जाचाला कंटाळून काही महिलांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अलिकडे मात्र चित्र बदलले असून कुटुंबात सून म्हणून आलेली स्री मुलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरु लागली आहे.
कुटुंबातील नातेसंबंध बदलण्यामध्ये सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहेच. कुटुंब टिकविणे ही खरे तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु जेव्हा जबाबदारी झटकली जाते. तेव्हा कौटुंबिक न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याची वेळ येते.
शहराच्या उत्तर भागातील काही गावांमधील तीन ते चार महिलांनी अशा प्रकारे अनेकांना गंडविल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अशा दोन-चार महिलांमुळे संपूर्ण महिलावर्गालाच दोषी ठरविणे योग्य होणार नाही. विवाह हा एक सामाजिक संस्कार आहे. त्यातून नातेसंबंध वाढीला लागावेत ही अपेक्षा आहे. त्यामध्ये काही कमीजास्त झाले तरी दोघांनीही समजून घेवून संसार केला पाहिजे. परंतु केवळ चैनीखातर घटस्फोटासारखे प्रकार घडत असल्याने सामाजिक स्वास्थ्याला तडे जात आहेत. याची जबाबदारी जितकी कुटुंबातील सदस्यांची आहे तितकीच ती समाजाचीही आहे.