वेळूस येथील बैठकीत ग्रामस्थांची माहिती, काजू मोसमापूर्वी ग्राममेळावे आयोजित करण्याचा निश्चय
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या प्रश्नांसंदर्भात गोवा सरकारला सत्तरी तालुक्मयातील नागरिक प्रस्ताव सादर करणार आहेत। या संदर्भाछे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना सादर करण्यात येणार असून या संदर्भात त्यांनी ताबडतोब लक्ष घालावे अशा प्रकारची मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काजू मौसम सुरू होण्यापूर्वी सत्तरी तालुक्मयातील सर्व गावांमध्ये ग्राममेळावे आयोजित करून सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकी प्रश्नासंदर्भात जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या संदर्भाची एक महत्वाची बैठक आज वेळूस येथील देवस्थानच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी 26जानेवारी घेण्यात आलेल्या मोठय़ा मेळाव्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या ठरावावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. या बैठकीला वेगवेगळय़ा गावातील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्नासंदर्भात गेल्या साठ वर्षापासून सातत्याने मागणी होत आहे. मात्र सत्तेवर आलेल्या एकाही सरकारने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत .यामुळे जमीन मालकीचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिलेला आहे. यामुळे जमीन मालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .यासंदर्भात मागणी करूनही सरकारची यंत्रणा अजिबात दाद द्यायला तयार नाही .यामुळे जमीन मालकांना जमीन ताब्यात असतानाही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे.
यासंदर्भाच्या मागण्या अनेकवेळा करण्यात आल्या .राजकीय पक्षाने अनेकवेळा आपल्या जाहीरनाम्यात जमीन मालकी देण्यावरून आश्वासन दिले. मात्र त्याची अंमलबजावणी अजिबात झालेले नाही.
यासंदर्भाची मागणी संदर्भात असलेली तीव्र स्वरूपाची भावना म्हणून 26 जानेवारी रोजी आमंत्रित केलेल्या जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात वाळपईमध्ये मोठय़ा प्रमाणात लढा उभारण्यात आला. या लढय़ाचा शेवट जोपर्यंत जमीन मालकी प्राप्त होत नाही तोपर्यंत होणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या महामेळाव्यात वेगवेगळय़ा प्रकारचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आज वेळूस देवस्थानच्या प्रांगणामध्ये खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीस सत्तरी तालुक्मयातील वेगवेळय़ा गावातील निवडण्यात आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सदर ठरावावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली
सह्यांची मोहीम सुरू.
यातील एक महत्त्वाचा म्हणजे सत्तरी तालुक्मयातील सर्व जमीन मालकीच्या सह्यांचे निवेदन तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत आहे. ज्यांना जमीन मालकीचा अधिकार प्राप्त करायचा असेल त्यांनी निवेदनावर सह्या कराव्यात अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. एकूण प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्मयातील ज्या गावांमध्ये सह्यांची मोहीम सुरू आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. वेगवेगळय़ा प्रतिनिधीने यासदर्भाचा आढावा समन्वय समितीसमोर ठेवला. ज्यांच्या पर्यंत अजून पर्यंत सह्यांचे निवेदन पोहोचलेले नाही त्या सर्वांनी आपल्या गावातील प्रतिनिधीशी संपर्क साधून सहाच्या निवेदनावर सह्या कराव्यात अशा प्रकारचे आवाहन आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना निवेदन सादर करणार.
26 रोजी घेण्यात आलेल्या महामेळाव्यात जमीन मालकी व वेगवेगळय़ा प्रकारच्या जमिनीसंदर्भात निवेदन तयार करून ते सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासंदर्भाची तयारी सुरू आहे. सध्यातरी सहाच्या निवेदनाचा एक खास प्रस्ताव तयार करण्यात येणार असून त्यानंतर हा प्रस्ताव गोवा सरकारचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना सादर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींना सदर निवेदन सादर करण्यात येणार असून त्यांच्यावरही जमीन मालकी प्रश्न संपुष्टात येण्यासाठी दबाव टाकण्यात येणार आहे. यावेळी आयोजित बैठकीत वेगवेगळय़ा प्रतिनिधी व उपस्थितांनी वेगवेगळय़ा प्रकारची मते मांडली.
ग्राममेळावे आयोजित करणार.
सतिरी तालुक्मयातील जनतेची जमीन मालकीच्या प्रश्नावर मोठय़ा प्रमाणात फरफट सुरू आहे. यासंदर्भात जमीन मालकांना न्याय प्राप्त व्हावा यासाठी सध्या उभारण्यात आलेल्या लढय़ाला सर्वांनी सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन महामेळावाच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. दरम्यान येणाऱया एक महिन्यात काजूचा मौसम सुरू होणार आहे. यामुळे नागरिक काजू मौसमात व्यस्त राहण्याची शक्मयता असल्यामुळे तत्पूर्वी सर्व गावातील ग्राममेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समजते. या ग्राममेळाव्यात जमीन मालकीच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात येणार असून ग्रामीण मेळाव्याच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे .यामुळे हा ग्राममेळावा सत्तरी तालुक्मयाच्या जमीन मालकीच्या अस्तित्वा संदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. या संदर्भातही सविस्तरपणे चर्चा करण्यात आल्याचे समजते.