वाळपई/प्रतिनिधी.
गेल्या जवळपास तीन महिन्यापासून जागतिक स्तरावर निर्माण झालेली कोरोना रोगाची महामारीमुळे समाजात मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेली भयभीत स्वरूपाची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्मयात आज पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या नागपंचमीच्या दिनी मोठय़ा प्रमाणात साकडे घालून ही महामारी दूर करण्याची प्रार्थना नागरिकांकडून करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या महामारीवर लगेचच लस सापडावी व यामहामारीपासून नागरिक भयमुक्त व्हावे अशा प्रकारची प्रार्थना करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात नागपंचमीचा पारंपरिक सण उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक गावांमध्ये दुपारी तर काही गावांमध्ये संध्याकाळच्या वेळी नागाचे पूजन करण्यात आले .
पूर्णपणे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येत असतानाच यंदा मात्र कोरोना रोगाची महामारीची समस्या प्रामुख्याने पहावयास मिळाली. दुपारी व संध्याकाळी नागपंचमीची पूजा करीत असतानाच अनेक ठिकाणी सार्वजनिक साकडे घालण्याची परंपरा सत्तरी तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये आहे. आज पारंपरिक पद्धतीने सामूहिकरीत्या साकडे घालत असतानाच नागदेवतेकडे या महामारी मुक्त करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे .सध्या मोठय़ा प्रमाणात मानवी जीवावर संक्रांत निर्माण झाली असून यापासून मनुष्याचे रक्षण व्हावे व या रोगावर लवकरात लवकर लस सापडावी अशाप्रकारचे प्रार्थना करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना करंझोळ येथील हरिचंद्र गावस यांनी सांगितले की नागपंचमीचा उत्सव या गावांमध्ये दुपारी साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करीत असताना यंदा मात्र कोरोना रोगाच्या महामारीचा प्रभाव पहावयास मिळाला. गावातील नागरिकांनी नागदेवते समोर सामूहिकरीत्या साकडे घालून या रोगापासून भयमुक्त करण्यासाठी आवश्यक स्वरूपाची उपाययोजना निर्माण व्हावी अशा प्रकारची प्रार्थना केली.
कोपार्डे सत्तर येथील प्रति÷ित नागरिक रामा सावंत यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या महाभयंकर रोगापासून मनुष्याच्या रक्षण होण्यासाठी सार्वजनिक स्वरूपाचे साकडे नागदेवते घालण्यात आले .नागपंचमी साजरा करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून विकसित झालेली आहे. यामुळे या सणाची व मानवाची एक वेगळय़ा प्रकारचे नाते जुळलेले आहे .नागदेवतची पूजा करणे म्हणजे एका अर्थाने निसर्गाची पूजा करण्याची प्रथा रूढ झालेली आहे. यामुळे निसर्गामध्ये या रोगाचा नायनाट करण्याची क्षमता असून यावर लवकरात लवकर लस सापडल्यास ही महामारी जागतिक स्तरावर नष्ट होणार आहे . ही लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर आपल्या शास्त्रज्ञांकडून होणारे प्रयत्नांना नागदेवतेने पाठबळ प्राप्त करून द्यावे अशा प्रकारचे साकडे देवतेकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.