आंघोळ करणाऱयांसाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन, दगड वाहून येण्याची शक्यता
प्रतिनिधी. /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील बहुतांश धबधबे प्रवाहित झालेले असून गेल्या आठवडय़ापासून पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीला धबधब्यावर आंघोळ करणे अत्यंत धोक्मयाचे ठरू शकते. यामुळे धबधब्यावर आंघोळ करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात मान्सून गेल्या आठ दिवसापासून सक्रिय झालेला आहे. यामुळे काही प्रमाणात नद्यांच्या पात्रामध्यही पाणी वाढलेले दिसत आहे. तसेच धबधबे प्रवाहित होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळी मोसमात कोसळणारे धबधबे हे प्रत्येकासाठी आकर्षण असते. यामुळे चार महिने विविध धबधब्यांवर गर्दी होताना दिसत असते. गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे धबधब्यावर आंघोळ करण्यास सरकारने प्रतिबंध केले होते. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.
पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड वाहून येण्याची शक्यता
दरम्यान या आठवडय़ाच्या शनिवारी किंवा रविवारी धबधब्यांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होण्याची शक्मयता आहे. मात्र नुकतेच प्रवाहित झालेले धबधबे अनेकांसाठी धोक्मयाचे बनू शकतात. धबधब्याच्या माथ्यावरुन पाण्याच्या प्रवाहासोबत दगड वाहून येण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास धबधब्यावर आंघोळ करणे महागाचे बनू शकते. त्यामुळे पर्यटकांनी निदान आणखी आठ दिवस तरी धबधब्यावर आंघोळ करू नये असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.
चरावणे, हीवरे, पाल, नानेली, सालेली धबधब्यांना अधिक पसंती
गेल्या काही वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील डोंगरातून कोसळणारे धबधबे हे पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागलेले आहेत. अनेक धबधबे कमी चालण्याच्या अंतरावर असल्यामुळे त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यामध्ये खास करून चरावणे, हिवरे, पाल, नानेली, सालेली धबधब्यांचा समावेश आहे. या धबधब्यावर शनिवारी व रविवारी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे हे धबधबे सध्यातरी पर्यटकांसाठी अधिक पसंतीचे ठरतात असे निदर्शनास आलेले आहे.