अनिल आजगावकर यांचे प्रतिपादन : वसंत व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्राrचा वैचारिक प्रवास’ विषयावर व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
कोणत्याही क्षेत्रात बदल लगेच घडत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या काळावर स्त्रियांनी मात केली व कर्तृत्व गाजवले. परंतु सर्वच क्षेत्रात समतावादी समाजरचना उभी करण्याच्या दृष्टिने भारताची वाटचाल सुरू आहे. मात्र राजकारणाच्या क्षेत्रासह हा समतोल साधणे आवश्यक आहे, असे मत अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले.
राज्य मराठी विकास परिषदेच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अर्थसाहाय्य योजनेंतर्गत हेरवाडकर शाळेत सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्राrचा वैचारिक प्रवास’ या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले, आजवर भारतीय महिलांचा सामाजिक वैचारिक प्रवास झाला. त्यामागे एक विचार आहे व त्या अनुषंगाने त्यांचा विकास झाला आहे. भारतीय राज्यघटनेने स्त्राr-पुरुषांना समान संधी दिलीच. परंतु इतिहास लक्षात घेत स्त्रियांसाठी हुंडाबळी, समान वेतन, अत्याचारविरोधी कायदेही केले. विशेष म्हणजे महिलांना व पुरुषांना एकाचवेळी मतदानाचा, शिक्षणाचा अधिकार देण्यात आला व महिलांच्या निवासासाठी वसतिगृहे निर्माण केली.
तथापि पुरुषप्रधान व्यवस्था-मनुस्मृतीचे कायदे यामुळे स्वकीयांसह संघर्ष करण्याची वेळ आली. कुटुंब व्यवस्थेत त्याचे स्थान दुय्यम राहिले. परिणामी शिक्षण व नोकरी यासाठी बंधन झुगारण्याचे धाडस त्यांना करावे लागले. तत्कालीन गरीबीमुळे मनुष्याचा प्राधान्यक्रम हा पैसे मिळवणे व मुलाला शिक्षित करणे याकडे होता. मात्र परिस्थिती बदलत गेली. संघर्ष, तडजोड, लवचिकता, समन्वय असे धोरण ठेवत महिला शिक्षित होऊन पुढे येवू लागल्या.
साधारण 1950 ते 1960 च्या दशकात काही स्त्रियांच्या हे लक्षात आले की कायदे आहेत पण अंमलबजावणी कागदावरच आहे. त्यामुळे स्त्राr प्रश्न घेऊन स्त्राr संघटना पुढे झाल्या. 1972 मध्ये इला भट या कार्यकर्तीने एक संघटना स्थापन केली. ती ‘सेल्फ एम्लॉईट वुमन्स असोसिएशन’ अर्थात ‘सेवा’ होय. संघटित महिलांचे प्रश्न सोडवून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा ‘सेवा’चा हेतू होता. याच दरम्यान संघर्ष करून ट्रेड युनियन नोंदणी केली. सर्व तऱहेच्या शोषणापासून मुक्ती, रोजगार व बढतीची संधी हे तिचे उद्दिष्ट राहिले. याच आदर्शावर महिलांच्या अनेक संघटना उभ्या झाल्या व महिलांच्या प्रश्नांवर काम करू लागल्या.
माध्यमांनी चळवळींना बळ दिले
चळवळीत मध्यमवर्गीय व कष्टकरी महिलांचा समावेश होता. माध्यमांनी या चळवळींना बळ दिले. या अभिसरणात महिलांना आपल्या स्वत्वची जाणीव होऊ लागली. संततीनियमन आरोग्य हे प्रश्न चर्चेत आले. नव्या विचाराने कुटुंब मर्यादित झाले. रोजगारांसाठी त्या बाहेर पडल्या व अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. महिलांचे विश्व बदलत गेले तसे कुटुंबाची मानसिकता बदलत गेली. प्रारंभी त्या टिकेचे लक्ष्य ठरल्या. परंतु नंतर त्यांना मान मिळू लागला, असे आजगावकर म्हणाले.
नव उत्पादन क्षेत्रात महिलांचा सहभाग
कालांतराने संगणकीचं आधुनिक तंत्रज्ञान यामुळे उत्पादनाच्या संकल्पना बदलल्या व नवीन अर्थव्यवस्थेत महिलांसाठी मोठी मागणी वाढली. नव उत्पादन क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढला. परंतु साहित्यिक क्षेत्र मात्र त्यांच्यासाठी वंचित राहिले. महिलांच्या प्रतिमा पुरुषांनी साहित्यात मांडल्या. परंतु त्यावर प्रश्नचिन्ह करतच महिला लेखन करू लागल्या व आमचे प्रश्न विचार स्वप्न आपल्या पद्धतीने लिहू असे सांगत स्त्राrवादी साहित्य लेखन सुरू झाले, अशी माहिती वक्त्यांनी दिली.
अन्यथा पुन्हा महिलांच्या प्रगतीला खीळ बसेल!
महिलांनी भेदाभेद पाणी, पर्यावरण, अत्याचार, हिंसा असे प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली. आज त्यांचे साहित्य पुरुषांइतकेच दर्जेदार आहे. 25 वर्षांपूर्वी ज्या क्षेत्रात स्त्राrला प्रवेश नव्हता असे लष्कर, गिर्यारोहण, अवकाश, हवाई क्षेत्रात भारतीय महिलांनी प्रवेश करून कौशल्य सिद्ध केले. मात्र राजकारणात त्यांचा सहभाग कमी आहे. महिलांच्या बुद्धीला-कौशल्याला तेथे खूप वाव आहे. पण हा सहभाग वाढला नाही तर स्त्रियांना काय हवे हे पुरुष ठरवतील व समतोल बिघडण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वस्थानी महिला नाहीत. हा विरोधाभास दूर होण्यासाठी आरक्षण देण्यात आले. पण त्यांच्या नावे पुरुषच लुडबुड करू लागले. हे चित्र बदलले नाही तर पुन्हा महिलांच्या प्रगतीला खीळ बसेल, असे आजगावकर यांनी नमूद केले.
2001 ते 2011 या सर्वेक्षणात स्त्राr-पुरुष साक्षरतेच्या प्रमाणात 18 टक्के तफावत आहे. 2011 ते 2021 च्या गणतीत हे प्रमाण वाढले नाही तर आपण परत मागे जावू. कारण सरकार शिक्षणक्षेत्रातून अंग काढून घेत आहे व त्याचे खासगीकरण झाल्याने ते महाग होत आहे. परिणामी महिलांना तेथे प्राधान्य मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
प्रारंभी चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्षा मीना खानोलकर यांनी केले. तसेच संस्थापिका मंदाकिनी दप्तरदार यांच्या स्मरणार्थ ध्वनी संयोजनाची जबाबदारी घेऊन सहकार्य करणारे गुरु पेडणेकर व साहाय्यक राजा पवार यांचा स्वरुपा इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वक्त्यांचा परिचय करून देऊन नमिता कुरुंदवाड यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
वसंत व्याख्यानमालेच्या स्पर्धेचा निकाल जाहिर
वसंत व्याख्यानमालेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. या स्पर्धेत श्वेता परब यांनी प्रथम, प्रतिभा आपटे यांनी द्वितीय, वृषाली दिवेकर यांनी तृतिय क्रमांक मिळविला. लिना देशपांडे यांनी उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले. परीक्षक म्हणून अनिता फडणीस यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना मंगळवारी वक्ते अनिल आजगावकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
अनिरूद्ध ठुसे यांचे आज व्याख्यान
हेरवाडकर शाळेत सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमाले अंतर्गत बुधवार दि. 21 रोजी अनिरूद्ध ठुसे यांचे सायंकाळी 5.30 वा. ‘अर्थकारण – काल आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यांचा
अनिरूद्ध मुळचे पुण्याचे असुन, सध्या त्यांचे वास्तव्य बेळगावला असून ते व्यवसाय सल्लागार म्हणून काम पाहतात. गेली 15 वर्षे पुणे व 3 वर्षे बेळगाव येथे व्यवस्थापन शास्त्राचे प्राध्यापक म्हणुन त्यांनी काम केले. फायनान्स या विषयामध्ये त्यांनी पीएचडी मिळविली आहे. काही काळ डी. वाय. पाटील विद्यापिठ येथे पीएचडी मार्गदर्शक म्हणून काम केले.
तिरूचिरापल्ली, हैद्राबाद, पुणे येथे झालेल्या वित्त विषयक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांचा सहभाग होता. त्यांचे अनेक लेख आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांना रंगभुमी, साहित्य व संगीताची आवड आहे. बुक लव्हर्स क्लब व चित्रलोक मुव्ही क्लब तसेच बेळगावच्या रंगभुमीवर ते कार्यरत आहेत.