कोरोना आणि दिवाळी सणानिमित्त पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने कोरोना नियंत्रणात आहे.हे नियंत्रण कायम राहावे यासाठी नागरिकांनी दिवाळी सणात काळजी घ्यावी.स्वत:सह कुटुंब आणि समाजाचा विचार करुन एकमेकाला न भेटता दिवाळीचा सण आनंदाने साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी तरुण भारत शी बोलताना केले.
ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज हजाराच्या घरात पोहोचली होती.सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, प्रशासनाचे प्रयत्न यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आली पाहिजे. सद्या दिवाळी सणाला सुरु झाली आहे.खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. ही खरेदी करण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी जाणे टाळावे.तसेच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स पाळावे. कारण या गर्दीतून पुन्हा संसर्गाची शक्यता नाकारता येता नाही. दिवाळीनंतर त्याचे परिणाम समोर येतील. दिवाळी सणाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी कुटुंबियासमवेतच सण साजरा करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.बलकवडे यांनी केले.