प्रतिनिधी /केपे
अद्याप कोरोना महामारी पूर्णपणे संपलेली नाही. म्हणून सरकारने पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करताना योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. यासंदर्भात बालरोगतज्ञांचाही सल्ला घेतला जावा, असे मत केपे येथील ज्येष्ट डॉक्टर उमेश नेत्रावळकर यांनी व्यक्त केले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी शाळेत येणार कसे, बस वा तत्सम वाहनाने प्रवास केल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग जडू शकतो काय याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. शिवाय सामाजिक अंतर राखणेही तेवढेच गरजेचे आहे, असे ते म्हणाले. या सर्व गोष्टींचा विचार करूनच शाळा सुरू केल्या जाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.