प्रतिनिधी/ मोरजी
सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहेकी ,मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उचललेली पावले योग्य दिशेत आहेत त्यात प्रामुख्याने गृहखाते ,महसूल खाते ,आणि आरोग्य खाते लोकांना योग्य सेवा देत आहेत परंतु अन्न प्रशासन खाते ,वजन माप खाते ,नागरी पुरवठा आणि ग्राहक हक्क निवारण खाते या बद्दल लोकात संशयाचे वातावरण आहे
काही दुकानदार लोकांच्या असाह्यतेचा फायदा उठवताना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ग्राहकांना लुटत आहेत त्यात प्रामुख्याने तांदूळ ,दुध ,आटा,साखर,डाळ अन्य किरणा वस्तू ,भाजीपाला यांचा समावेश आहे
यासाठी श्री मोरजकर यांनी या पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली आहे कि जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याची अंमलबजावणी करताना काळाबाजार करणाऱया वर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे ,