हिस्सेदारी विक्रीतून 2 लाख कोटी मिळणार
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम(एलआयसी) मधील सरकार 25 टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना बनवत आहे. आजच्या मूल्यानुसार सदरची हिस्सेदारी विकल्यावर सरकारला जवळपास 2 लाख कोटी रुपये मिळणार आहेत. ही विक्रीची प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी कंपनीने दिली आहे.
यासंदर्भात सरकार संसद कायद्याचा आधार घेणार असल्याचे समजते, ज्या अंतर्गत हिस्सेदारी विक्री करता येणार आहे. साधारणपणे एलआयसीमधील 10 टक्के हिस्सेदारी विकून 80 हजार कोटी उभारण्याची योजना आहे. सरकार चालू वित्त वर्षामध्ये एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. एलआयसीचा आयपीओ बाजारात उतरवण्याबाबत स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे.
गुंतवणूक दोन लाख
कोटीहून अधिक
देशातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी एलआयसी वार्षिक पातळीवर 2 लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक करत असते. यातील 50 ते 60 हजार कोटी समभाग बाजारातील आणि अन्य डेट बाजारसह अन्य गुंतवणुकीतील
आहेत.